शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, पाहा काय म्हणाले केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 19:16 IST

राज्य सरकार इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना दिला जाणारा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. पाहा शिक्षण क्षेत्रात काय बदल होणार, काय म्हणाले केसरकर...

राज्यात शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. जर यावर शिक्कामोर्तब झालं तर हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो.

“मुलांना ओव्हरबर्डन करू नये, त्यांच्या मेंदूचा विकास होऊ दिला पाहिजे असं माझं मत आहे. तर गृहपाठ शिक्षकांसाठी पळवाटदेखील असता कामा नये. मला शिक्षकांबद्दल आदर आहे. आपण जे काही अर्धा तास शिकवतो ते त्यांनी लक्षपूर्वक शिकवलं पाहिजे की विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याची आवश्यकताच राहता कामा नये. हे माझं वैयक्तिक मत आहे,” असं केसरकर म्हणाले.“यासंदर्भात मी शिक्षकांच्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी, संस्था चालकांशी बोलेन आणि त्यानंतर निर्णय घेईन. इतका मोठा निर्णय सहजासहजी घेता येत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी बाब म्हणजे आम्ही आता एज्युकेशनल सिस्टमला जी काही पुस्तकं देतोय ती पूर्णपणे बदलत आहोत. एक धडा झाल्यावर त्यालाच जोडलेले दोन पेपर्स असतील. म्हणजे मुलं धडा झाल्यानंतर त्यातच नोंद करू शकेल. पुस्तकं तीन भागांमध्ये असतील. पुढच्या वर्षी जेव्हा मुल शाळेत जाईल तेव्हा ते एकच पुस्तक घेऊन जाईल. हा प्रयोग १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण