शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहातून वाढून यशाचं शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्य सरकारकडून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 17:39 IST

Ratnagiri News : समाजातील मुलासमोर आदर्श निर्माण केला अशा महाराष्ट्रातील 33 मुलांचा सत्कार करण्यात आला.

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागाकडून 2020 - 21 पुरस्कार सन्मान सोहळा बुधवारी पार पडला. महाराष्ट्रातील बालगृहातून वाढलेल्या मुलांना प्राप्त परिस्थितीशी सामना करत कोणत्याही प्रकारचे आर्थिक सामाजिक पाठबळ नसताना आपले जीवन यश्वस्वी केले. वेळप्रसंगी उपाशी राहून तर हॉटेलमध्ये दुकानात नोकरी करत आपले आयुष्य यशस्वी केलं आहे. समाजातील मुलासमोर आदर्श निर्माण केला अशा महाराष्ट्रातील 33 मुलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी येथे कार्यरत असलेल्या वात्सल्य मंदिर या संस्थेतील 6 मुलांचा गौरव करण्यात आला. ही रत्नागिरी जिल्हासाठी अभिमानास्पद बाब आहे.

गेले 40 वर्ष समाजातील अनाथ, निराधार, काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी बालकाश्रम वात्सल्य मंदिर, ओणी चालवत आहे. आजपर्यत 235 मुले शिक्षण पूर्ण करून संस्थेतून बाहेर पडली आहेत. त्यापैकी काही मुले पदवी शिक्षण घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. काही मुले इंजिनिअरिंगची पदवी/ पदविका घेऊन बाहेर पडले आहेत. काही मुलांनी खेळात राष्ट्रिय स्तरावर चमक दाखवली आहे. काही पोलिस, कमांडो, शिक्षक, वकील, मूर्तीकार, चित्रकार तर संस्थेतील एका विद्यार्थ्याने रसायन शास्त्रात डॉक्टरेट पदवी घेऊन संशोधन करत आहे. अशा विविध क्षेत्रात मुले समाजात प्रत्यक्ष काम करत आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागाकडून 2020-21 पुरस्कार सन्मान झालेले विद्यार्थी

1.    विजय सराटे

एम. एस. डब्ल्यू ही पदवी प्राप्त करून बालगृहातील मुलीशी विवाह करून आज नालासोपारा येथे नारायण ट्र्स्ट तर्फ़े बालकाश्रम, वृध्दाश्रम व नोकरी करणा-या स्त्रीयांसाठी वस्तीगृह गेले 15 वर्ष सातत्याने चालवत आहेत.

2.    संजय सराटे 

बी. एस्सी करून फ़िनोलेक्स कंपनीत काम करून इंडोनेशिया येथे काही काळ काम केले. रत्नागिरीत पहिला सायबर कॅफ़े सुरू करणारा हा विद्यार्थी.

3. महेशकुमार 

कृषी पदवीका प्राप्त केल्यावर काही वर्ष संस्थेसाठी दिल्यावर शासकिय नोकरीत दाखल नोकरी करतच एम. ए. पदवी पूर्ण केली तसेच बीएस्सी. अँग्री करून कृषी अधिकारी म्हणून सेवेत दाखल आहेत.

4. गाँडफ्री फर्नांडीस

10 वीला अपेक्षीत यश मिळालेले नाही. तरी ही खचून न जाता जिद्दीने सायन्स विभागाकडे प्रवेश मिळवून पुढे रसायन शास्त्रात चांगल्या प्रकारे यश मिळ्वून  जगमान्य अशा I.C.T.  या संस्थेतून रसायन शास्त्रात पी. एच.डी. केली.

आजही त्याच संस्थेत मार्गदर्शक व शासकीय कंपनीचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. वात्सल्य मंदिर संस्थेच्या कार्यकारणी सभासद आहे. आजपर्यत 4 पेटंट नावावर आहेत.

5. अभय तेली

बी. ए. शिक्षण पूर्ण करून पोलीस म्हणून भरती झाला. तिथेच न राहता स्वतःच्या जिद्दीवर व कष्टावर राज्य शासनाच्या एफ़ वन फ़ोर्स मध्ये कंमांडो म्हणून कार्यरत पुढे एम. ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अनाथ मुलांच्या समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

6. वैभव कोळेकर

10 वी नंतर सावर्डे येथे आर्ट महाविद्यालयात 4 वर्ष पदवी  घेतली. त्या कालावधीत त्याच्या कलेला मुंबई येथील जहांगीर आर्टमध्ये राष्ट्रीय पारितोषिक मिळविले. चीन मध्ये मकाव बेटावर दीड वर्ष काम केले. सद्या देशातल्या विविध ठिकाणी आपला व्यवसाय करत आहे. काम करत असताना स्वतः बरोबर इतर 20-25 मुलांना रोजगार दिला आहे.

अशा प्रकारे बालकाश्रमात राहून गगण भरारी घेऊन विषेश प्राविण्य मिळाविलेल्या 32 विद्यार्थ्यांचा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान होणे म्हणजे संस्थेच्या मानात रोवलेला तुराच जणू. महाराष्ट्र शासनाने गौरव करून फ़क्त लढ म्हणा अस दिलेलं पाठबळ हेच संस्थांना शंभर हत्तीच बळ निर्माण करून देणारं आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी दिली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRatnagiriरत्नागिरी