शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

बालगृहातून वाढून यशाचं शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्य सरकारकडून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 17:39 IST

Ratnagiri News : समाजातील मुलासमोर आदर्श निर्माण केला अशा महाराष्ट्रातील 33 मुलांचा सत्कार करण्यात आला.

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागाकडून 2020 - 21 पुरस्कार सन्मान सोहळा बुधवारी पार पडला. महाराष्ट्रातील बालगृहातून वाढलेल्या मुलांना प्राप्त परिस्थितीशी सामना करत कोणत्याही प्रकारचे आर्थिक सामाजिक पाठबळ नसताना आपले जीवन यश्वस्वी केले. वेळप्रसंगी उपाशी राहून तर हॉटेलमध्ये दुकानात नोकरी करत आपले आयुष्य यशस्वी केलं आहे. समाजातील मुलासमोर आदर्श निर्माण केला अशा महाराष्ट्रातील 33 मुलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी येथे कार्यरत असलेल्या वात्सल्य मंदिर या संस्थेतील 6 मुलांचा गौरव करण्यात आला. ही रत्नागिरी जिल्हासाठी अभिमानास्पद बाब आहे.

गेले 40 वर्ष समाजातील अनाथ, निराधार, काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी बालकाश्रम वात्सल्य मंदिर, ओणी चालवत आहे. आजपर्यत 235 मुले शिक्षण पूर्ण करून संस्थेतून बाहेर पडली आहेत. त्यापैकी काही मुले पदवी शिक्षण घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. काही मुले इंजिनिअरिंगची पदवी/ पदविका घेऊन बाहेर पडले आहेत. काही मुलांनी खेळात राष्ट्रिय स्तरावर चमक दाखवली आहे. काही पोलिस, कमांडो, शिक्षक, वकील, मूर्तीकार, चित्रकार तर संस्थेतील एका विद्यार्थ्याने रसायन शास्त्रात डॉक्टरेट पदवी घेऊन संशोधन करत आहे. अशा विविध क्षेत्रात मुले समाजात प्रत्यक्ष काम करत आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागाकडून 2020-21 पुरस्कार सन्मान झालेले विद्यार्थी

1.    विजय सराटे

एम. एस. डब्ल्यू ही पदवी प्राप्त करून बालगृहातील मुलीशी विवाह करून आज नालासोपारा येथे नारायण ट्र्स्ट तर्फ़े बालकाश्रम, वृध्दाश्रम व नोकरी करणा-या स्त्रीयांसाठी वस्तीगृह गेले 15 वर्ष सातत्याने चालवत आहेत.

2.    संजय सराटे 

बी. एस्सी करून फ़िनोलेक्स कंपनीत काम करून इंडोनेशिया येथे काही काळ काम केले. रत्नागिरीत पहिला सायबर कॅफ़े सुरू करणारा हा विद्यार्थी.

3. महेशकुमार 

कृषी पदवीका प्राप्त केल्यावर काही वर्ष संस्थेसाठी दिल्यावर शासकिय नोकरीत दाखल नोकरी करतच एम. ए. पदवी पूर्ण केली तसेच बीएस्सी. अँग्री करून कृषी अधिकारी म्हणून सेवेत दाखल आहेत.

4. गाँडफ्री फर्नांडीस

10 वीला अपेक्षीत यश मिळालेले नाही. तरी ही खचून न जाता जिद्दीने सायन्स विभागाकडे प्रवेश मिळवून पुढे रसायन शास्त्रात चांगल्या प्रकारे यश मिळ्वून  जगमान्य अशा I.C.T.  या संस्थेतून रसायन शास्त्रात पी. एच.डी. केली.

आजही त्याच संस्थेत मार्गदर्शक व शासकीय कंपनीचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. वात्सल्य मंदिर संस्थेच्या कार्यकारणी सभासद आहे. आजपर्यत 4 पेटंट नावावर आहेत.

5. अभय तेली

बी. ए. शिक्षण पूर्ण करून पोलीस म्हणून भरती झाला. तिथेच न राहता स्वतःच्या जिद्दीवर व कष्टावर राज्य शासनाच्या एफ़ वन फ़ोर्स मध्ये कंमांडो म्हणून कार्यरत पुढे एम. ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अनाथ मुलांच्या समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

6. वैभव कोळेकर

10 वी नंतर सावर्डे येथे आर्ट महाविद्यालयात 4 वर्ष पदवी  घेतली. त्या कालावधीत त्याच्या कलेला मुंबई येथील जहांगीर आर्टमध्ये राष्ट्रीय पारितोषिक मिळविले. चीन मध्ये मकाव बेटावर दीड वर्ष काम केले. सद्या देशातल्या विविध ठिकाणी आपला व्यवसाय करत आहे. काम करत असताना स्वतः बरोबर इतर 20-25 मुलांना रोजगार दिला आहे.

अशा प्रकारे बालकाश्रमात राहून गगण भरारी घेऊन विषेश प्राविण्य मिळाविलेल्या 32 विद्यार्थ्यांचा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान होणे म्हणजे संस्थेच्या मानात रोवलेला तुराच जणू. महाराष्ट्र शासनाने गौरव करून फ़क्त लढ म्हणा अस दिलेलं पाठबळ हेच संस्थांना शंभर हत्तीच बळ निर्माण करून देणारं आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी दिली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRatnagiriरत्नागिरी