शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

दहावीसाठी अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय, राज्य मंडळाच्या शाळांना मत नोदविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 03:40 IST

राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन २० दिवसांचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप पुढची कार्यवाही काय असणार, याचा निर्णय शिक्षण विभाग किंवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेला नाही.

मुंबई : शाळास्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन शक्य आहे का, त्यासाठी शाळा सक्षम आहेत का? त्यांची काय तयारी आहे, याची चाचपणी शिक्षण विभाग करणार आहे. राज्यातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी असलेल्या सर्व शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळांच्या व्यवस्थापनाच्या शाळांची यासंदर्भातील मते आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने सर्वेक्षण हाती घेतले आहे. शाळांनी अचूक व स्पष्ट मत नोंदवावे, असे आवाहनही केले आहे. (State board asks suggestion to schools about Internal assessment option for 10th class)

राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन २० दिवसांचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप पुढची कार्यवाही काय असणार, याचा निर्णय शिक्षण विभाग किंवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेला नाही. सीबीएसई मंडळाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर गुण देण्यात येतील, असे घोषित करण्यात आले; मात्र त्यासंदर्भात तज्ज्ञांच्या बैठकांवर बैठका होऊनही कशाच्या आधारावर मूल्यमापन करावे याचे उत्तर शिक्षण विभागाला मिळाले नसल्याने त्याबाबतीतही काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा जीव मात्र यामुळे टांगणीला लागला असून शिक्षण विभाग वेळकाढूपणा का करीत आहे, असा सवाल ते विचारू लागल्याने आता शिक्षण विभागाने शाळास्तरावरच अंतर्गत मूल्यमापन करता येईल का, असा पर्याय समोर मांडून शाळांकडून याची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे शिक्षण विभागाकडून शाळास्तरावर अंतर्गत मूल्यमापनाची चाचपणी होत असताना दुसरीकडे शाळास्तरावरील मूल्यमापन किती पारदर्शक असेल? राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांशी होणारे गुणांचे समानीकरण यातून कसे साधले जाईल, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित होत आहे.

असे आहेत पर्याय-ज्या शाळांनी - शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग घेतले, ऑनलाइन चाचण्या घेतल्या आहेत किंवा व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून वर्ग / चाचण्या घेतल्या आहेत अशा शाळांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करता येईल. -ज्या शाळांनी प्रथम, द्वितीय सत्रात परीक्षा घेतल्या आहेत त्यांचाही समावेश अंतर्गत मूल्यमापनामध्ये करता येणार आहे. -ज्या शाळांनी यापैकी काहीच केले नाही त्यांना विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करता येईल, असा पर्याय शाळांना दिला आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक