शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कर्जदारांसाठी राज्य बँकेची ‘ओटीएस’ योजना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 21:38 IST

राज्य सहकारी बँकेने थकबाकीदार कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे. थकीत कर्जाच्या मूळ रक्कमेवर सरळव्याज पध्दतीने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमासिक हप्त्याचीही सुविधा : फेब्रुवारी अखेरीस अर्ज करण्याची संधीराज्य बँकेची तब्बल १ हजार ४९८ कोटी रुपयांची कर्जे थकीत परतफेड योजनेचे पत्र मिळाल्यापासून एक महिन्यात तडजोडीची सर्व रक्कम भरणे आवश्यक या खातेदारांना पुढील ५ वर्षापर्यंत नव्याने कर्ज मिळणार नाही.

पुणे : राज्य सहकारी बँकेने थकबाकीदार कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे. थकीत कर्जाच्या मूळ रक्कमेवर सरळव्याज पध्दतीने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. काही रक्कम भरल्यास २४ मासिक हप्त्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. राज्य बँकेची तब्बल १ हजार ४९८ कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत. त्यातील ३३५ कोटी रुपयांची थकीत कर्जे ही एक वर्षांच्या आतील आहेत. तर, १ हजार १६३ कोटी रुपयांची कर्जे तीन वर्षांपासून थकीत आहेत. या योजनेचा फायदा ३१ मार्च २०१८ अखेरीस थकीत असलेल्या कर्जदारांना होणार आहे. ही योजना ३१ मार्च २०१९ पर्यंत लागू असेल. मात्र, त्यात सहभागी होण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत अर्ज करता येतील. या शिवाय कोणत्याही कायद्यांतर्गत कारवाई असणाºया, कलम १०१ नुसार वसुली दाखला प्राप्त झालेल्या अथवा कलम ९१प्रमाणे निवाडे दाखल प्राप्त झालेल्या कर्ज प्रकरणांना देखील ही योजना लागू राहील, अशी माहिती राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. अनुत्पादक कर्ज खात्यांना केवळ मुद्दल रक्कमेवर ८ टक्के वार्षिक दराने सरळव्याज पद्धतीने व्याजाची आकारणी करण्यात येईल. राज्य बँकेचे एकरकमी परतफेड योजनेचे पत्र मिळाल्यापासून एक महिन्यात तडजोडीची सर्व रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज मंजुरीचे पत्र मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत तडजोड रक्कमेच्या २५ टक्के रक्कम भरल्यास संबंधित कर्जदाराला २४ मासिक हप्त्यांचा कालावधी देखील मिळेल. मात्र, कर्जदाराने एक महिन्यात २५ टक्के रक्कम न भरल्यास संबंधित व्यक्ती योजनेत सहभागी होऊ इच्छित नसल्याचे समजण्यात येईल. तसेच, त्याने अर्जासोबत भरलेली १० टक्के रक्कम मुद्दल कर्जात जमा केली जाईल. कर्जदाराने २५ टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरीत रक्कम २४ मासिक हप्त्यात वार्षिक १२ टक्के दराने भरायची आहे. या कालावधीत हप्ता चुकविल्यास उशीर झालेल्या रक्कमेवर २ टक्के दंड व्याज आ कारले जाणार आहे. कर्जखाते बंद करताना या खातेदारांना पुढील ५ वर्षापर्यंत नव्याने कर्ज मिळणार नाही.  ----या कर्जदारांना मिळणार नाही फायदाफसवणूक, गैरव्यवहार, आजी-माजी संचालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे, पगारदारांना दिलेले खावटी कर्ज, न्यायालयासमोर तडजोड झालेली प्रकरणांना योजनेचा फायदा मिळणार नाही. तर, शंभर कोटी रुपयांवरील कर्ज प्रकरणांना निबंधकांची पूर्व परवानगी आवश्यकराहील.

टॅग्स :PuneपुणेbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र