शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळच संपाला जबाबदार - हनुमंत ताटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:34 IST

एसटी कामगारांचा पगार किमान १८ हजार रुपये व्हावा, त्यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही एसटी महामंडळाकडे मागण्या मांडून पाठपुरावा करतो आहे़

एसटी कामगारांचा पगार किमान १८ हजार रुपये व्हावा, त्यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही एसटी महामंडळाकडे मागण्या मांडून पाठपुरावा करतो आहे़ त्यांना वेळोवेळी संपाची नोटीस दिली असली तरी प्रत्यक्ष संप केला नव्हता़ पण, त्यांनी दुर्लक्ष केल्याने कामगारांच्या दबावामुळे हा संप करावा लागत असून, प्रशासनाने तो आमच्यावर लादला असल्याचे एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़राज्यात एसटीचे १ लाख ७ हजार कामगार आहेत़ त्यांना सध्या ८ ते ९ हजार रुपयांवर काम करावे लागते़ यापूर्वी १९९५ पर्यंत राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी कामगार यांचे पगार एकाच तारखेला व्हायचे. पण, एसटीच्या तोट्याचे कारण पुढे करून वेळोवेळी पगारवाढ नाकारली़ या अपुºया पगारात त्यांची कौटुंबिक गरज भागविणे शक्य होत नाही़ कामगारांच्या पगारात वाढ करावी, या मागणीसाठी आम्ही गेली ३ वर्षे पाठपुरावा करीत आहोत़ तीनही वार्षिक अधिवेशनात त्याबाबतचे ठराव करण्यात आले होते़ २०१६ मध्ये नागपूर येथे झालेल्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित होते़ तर सांगली येथील अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आले होते़ राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू होईल, असे आश्वासनही दिले होते़एसटी कामगारांनी हा अचानक संप केलेला नाही़ दिवाळीच्या सणाच्या काळात हा संप केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो़ एसटी महामंडळाला वेळोवेळी इशारे दिले होते़ पण, एसटी कर्मचाºयांच्या २२ संघटना आहेत़ त्यातील ५ संघटनांनी संपाची नोटीस दिली आहे़ त्यामुळे त्यांनी या नोटिशीकडे दुर्लक्ष केले़ संपापूर्वी काल चर्चाही झाली होती़ पण, त्यात या नोटिशीवर कोणतीही चर्चा झाली नाही़यापूर्वी झालेल्या अधिवेशनात कामगारांचे मतदान घेण्यात आले होते़ त्या वेळी ९९ टक्के कामगारांनी मतदान करून संपाला पाठिंबा दिला होता़ हे सर्व महामंडळाला माहिती होते़ कामगारांचा कधीही संप होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना महामंडळाला होती़ तरीही त्यांनी दुर्लक्ष केले़एसटी कामगारांच्या संपाची नोटीस ५ संघटनांनी दिली असली तरी सर्व कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत़ त्यासाठी त्यांना आवाहनही करण्याची वेळ आली नाही़याबाबत उच्च न्यायालयात केस चालू आहे़ तेथे एसटी महामंडळाने प्रतिज्ञापत्र दिले आहे़ त्यात एसटीचा तोटा हा अवैध वाहतुकीमुळे होत असल्याचे म्हटले आहे़ अवैध वाहतुकीमुळे दरदिवशी २० कोटी रुपयांचा महसूल बुडतो आहे़ त्यावर कारवाई करून आपले उत्पन्न वाढविण्याचा कोणताही प्रयत्न महामंडळाने न करता केवळ कामगारांना देणाºया पगारात मात्र काटकसर करीत आहे़ राज्य शासनाने वेतन सुधारणा समिती स्थापन केली होती़ या समितीने संपूर्ण राज्यात फिरून माहिती घेतली़ त्यात त्यांनी म्हटले, की एसटी कामगारांचे वेतन कमी आहे़ ते वाढविण्याची गरज आहे़ मात्र, या समितीने सातवा वेतन आयोग द्यावा, याविषयी काहीही म्हटले नाही़ अन्य राज्यांतील राज्य मार्ग वाहतूक विभागाच्या कर्मचाºयांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कर्मचाºयांचे वेतन कमी आहे, हे सर्वांना माहिती असून, ते वाढविण्याची गरज असल्याचे महामंडळ आणि शासनालाही मान्य आहे़ असे असतानाही महामंडळाबरोबर ४ वर्षांचा करार केला तरी पगारातील तफावत भरून निघू शकत नाही़ असे असतानाही या मागण्यांना नकार देताना अशा पद्धतीने तो नाकारण्यात आला, की त्यामुळे कामगारांमध्ये संताप निर्माण झाला़ त्यामुळे कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहे़ अजूनही आमची विनंती आहे, की चर्चेने मार्ग निघू शकेल़ कामगारांचा पगार वाढावा, हाच यामागे हेतू आहे़ चर्चा करून कामगारांना न्याय मिळेपर्यंत हा संप सुरू राहील़

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र