शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

एसटी महामंडळाच्या कर्मचारी बदल्यांमध्ये सावळागोंधळ, ज्येष्ठता डावलून बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 07:36 IST

दोन वर्षांपूर्वी मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे यादीत नाव

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळात १५ टक्के बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ३७९ चालक आणि १०८ वाहकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. पण या बदल्यांमध्ये सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला होता, त्याचे नाव बदली यादीत आहे. तर या बदल्यांत सेवाज्येष्ठता डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे.एसटी महामंडळात गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये पालघर विभागातील गोरक्षनाथ कंठाळे या कर्मचाºयाचे नाव आहे. त्याचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता तरीही बदली यादीत नाव टाकण्यात आले आहे. काही काळापूर्वी बदली झालेल्या दहा कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. तसेच सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली आहे, असा आरोप कर्मचाºयांकडून केला जात आहे. कामगार संघटनेच्या एका पदाधिकाºयाने सांगितले की, काही काळापूर्वी औरंगाबाद येथून रायगडला बदली झालेल्या कर्मचाºयाची रायगडवरून पुन्हा अहमदनगरला बदली करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठता यादीचे नियम डावलण्यात आले आहेत. एकत्रित सेवा ज्येष्ठता नियम लावला पाहिजे, पण विभागातील सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली आहे. हा नियम पहिल्यांदा लावण्यात आला आहे. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.कोरोनाच्या काळात मुंबई उपगनरातील अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांना एसटी बसमधून प्रवासाची सुविधा दिली जात होती. त्या वेळी मुंबईत काम न करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली होती. आजही मुंबई, रत्नागिरी, ठाणे येथे कर्मचाºयांचा तुटवडा आहे. पण तरीही या ठिकाणच्या चालक आणि वाहकांच्या मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी बदल्या करण्याचा घाट का, असा सवाल एसटी कर्मचाºयांमधून विचारला जात आहे.बदल्यांना तोपर्यंत तात्पुरती स्थगितीएसटी महामंडळाने बदल्या केल्या होत्या, पण या बदल्यांमध्ये एका मृत कर्मचाºयाचे नाव होते. तसेच काही कर्मचाºयांची पुन्हा बदली करण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.- वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्र