शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे भाडे वाढले; पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 06:53 IST

‘भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत असावी’ असा प्रस्ताव एसटीने पाठवला होता. प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी एक रुपयाच्या पटीत भाडेवाढीचे आदेश काढले!

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

एसटीच्या बहुचर्चित भाडेवाढीला राज्य परिवहन प्राधिकरणाकडून अखेर हिरवा कंदील मिळाला; पण या भाडेवाढीतून  अनेक मुद्दे समोर आले असून, प्रवासी जनता व एसटीचे वाहक यांच्यात सुट्या पैशांवरून वादावादी सुरू झाली आहे. ही भाडेवाढ वादाच्या  व संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून,  राजकीय नेते व अनेक मंत्र्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी, असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने पाठवला होता. १६ जून २०१८  व २६ ऑक्टोबर २०२१ ला तशाच प्रकारे भाडेवाढ केल्याचे तोंडी सांगूनही  प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी पाच रुपयांच्या पटीत आर्थिक नुकसान होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे बदल करून  एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ  करण्यात यावी, असा आदेश प्रसारित केला. परिणामी गेले तीन दिवस सुट्या पैशांवरून वाद होऊन प्रवासी आणि एसटीचे वाहक यांच्यात खटके उडत आहे. यातून सर्वांनाच मानसिक त्रास होताना दिसतो आहे. निव्वळ राज्य परिवहन प्राधिकरणातील अधिकारीच जबाबदार आहेत. एसटीच्या भाडेवाढ प्रस्तावाला २५ जानेवारी रोजी  राज्य परिवहन प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली; पण मूळ प्रस्तावात भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत असावी असेच एसटीने स्पष्ट नमूद केले असताना एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. 

भाडेवाढ निर्णयाची  माहिती अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचे परिवहनमंत्र्यांनी केलेले विधान चुकीचे आहे.  भाडेवाढीसंदर्भात आदल्या दिवशी परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान भाडेवाढीची संपूर्ण माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली होती, अशी आमची माहिती आहे.  भाडेवाढ आणि त्यातून निर्माण झालेल्या सुट्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून एसटीचे वाहक  व प्रवासी यांच्यात वादावादी सुरू झाल्यावर सर्व स्तरांतून रोष निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळेच आता परिवहनमंत्र्यांनी हात झटकले असल्याचे दिसते. 

भाडेवाढीसारखे जनतेच्या संबंधातील विषय मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येऊन निर्णयासाठी मंत्रिमंडळाची मान्यता असावी लागते. किंबहुना असे निर्णय घेताना  मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना द्यावी लागते, असे संकेत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. त्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्ट दिसते. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी  आलाच नसल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८(२) तरतुदीनुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. मात्र गेले सुमारे २५ महिने प्राधिकरणाची बैठकच झाली नव्हती. वास्तविक पाहता वर्षातून दोन बैठका झाल्या पाहिजेत असा उल्लेख कायद्यामध्ये आहे. गेली चार वर्षे भाडेवाढ करण्यात आलेली नाही. खरे तर त्या त्या वेळी थोडी भाडेवाढ केली तर त्याचा एकदम फटका प्रवाशांना बसत नाही. एसटीतर्फे दरमहा विविध प्रकारचे ३६० कोटी रुपयांचे सवलतमूल्य प्रवाशांना दिले जाते, पण एसटीला सरकारतर्फे केवळ ३०० कोटी रुपये परतावामूल्य दिले जाते. 

एसटीचा तोटा वाढत चालल्याने १४.९५ टक्के इतकी सरासरी भाडेवाढ करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आला होता. भाडेवाढीचे सूत्र कसे असावे हेसुद्धा मूळ प्रस्तावात स्पष्ट नमूद करण्यात आले असून मूळ प्रस्तावाला प्राधिकरणाने पुन्हा एकदा बैठक घेऊन मंजुरी दिल्यास हा प्रश्न चुटकीसरशी  निकाली निघेल. यासंदर्भात गेले तीन दिवस सुरू असलेल्या चर्चा, नेतेमंडळींची वादग्रस्त वक्तव्ये, प्रवासी व एसटीचे वाहक यांच्यात सुट्या पैशांवरून झालेली वादावादी,  प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता हा विषय तातडीने मार्गी लावण्याचा झालेला आहे, हे नक्की!

टॅग्स :state transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार