शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के कर्मचारी रुजू, ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:16 IST

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कामावर रुजू होत आहेत. शुक्रवारी, अल्टिमेटमच्या शेवटच्या दिवशी ५,३९८ कर्मचारी रुजू झाले. आता एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले असून,  उपस्थित कर्मचाऱ्यांचा आकडा ८२,२६० वर पोहोचला आहे. त्यामुळे एसटीची ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर आली आहे. 

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या चालक- वाहकांना आर्थिक लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाचे राज्यभरातील चालक-वाहक दिवाळीपासून बेमुदत संपावर होते. प्रवाशांची गैरसोय होत असून, ती टाळण्यासाठी कामावर रूजू व्हा, असा आदेश हायकोर्टाने दिला हाेता.

बडतर्फ कर्मचाऱ्यांना करावे लागेल अपील -- या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे  एसटी महामंडळाने कारवाई करत १०,३०८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते.  आता या कर्मचाऱ्यांना अपील करावे लागेल. - त्यांची सुनावणी झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले जाईल. २२ एप्रिलपर्यंत ९,५७७ अपिले आली असून, त्यापैकी ४,७०१ अपिले निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या अपिलाची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण झाल्यानंतर तेही रुजू हाेतील.

चार हजार कर्मचाऱ्यांनी शोधला पर्याय : एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिने संप सुरू होता. या काळात तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांनी अन्य नोकरी शोधली आहे किंवा व्यवसाय सुरू केला आहे. असे तीन ते चार हजार कर्मचारी असून, ते कामावर परतणार नाहीत, अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

एसटीच्या फेऱ्या वाढल्या एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर परतले असून, कर्मचारी वाढल्याने एसटीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत...२७,५६९ - एसटी २५,७४९ - साधी १८६ - शिवनेरी२८६ - हिरकणी  ४३५ - शिवशाहीफेऱ्यांचा समावेश आहे.

उपस्थिती लवकरच १०० टक्क्यांपर्यंत जाईलन्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मोठ्या संख्येने एसटीचे कर्मचारी त्या त्या आगारांमध्ये कामावर रुजू झाले आहेत. सध्या ८५ टक्के वाहतूक सुरू असून,  लवकरच १०० टक्क्यांपर्यंत जाईल.  ग्रामीण भागातील आणि लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. एसटी पूर्वपदावर आली असून, राज्यातील  प्रवाशांनी आता त्याचा लाभ घ्यावा.     - शेखर चन्ने,  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय     संचालक, एसटी महामंडळ 

टॅग्स :ST Strikeएसटी संपBus DriverबसचालकMaharashtraमहाराष्ट्र