शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

Maharashtra SSC Result 2021 : दहावीच्या निकालात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क; तब्बल २२,३८४ शाळांचा निकाल 'शत प्रतिशत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 14:22 IST

Maharashtra SSC Result 2021: 100 percent marks for 957 students in X results; Results of 22,384 schools '100 per cent : कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्दे विशेष म्हणजे या परीक्षेत तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील २२,७६७ शाळांपैकी २२,३८४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. 

मुंबई - राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल  शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर, विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. Maharashtra SSC Result 2021: 100 percent marks for 957 students in X results; Results of 22,384 schools '100 per cent

कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राज्याचा निकाल ९९.९५ टक्के एवढा लागला आहे. त्यामध्ये कोकणा विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून पुणे विभागाचा सर्वात कमी म्हणजे ९९.६५ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील २२,७६७ शाळांपैकी २२,३८४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. 

असा बनविण्यात आला निकाल

राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.  

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झालेला निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

विभागिय मंडळ निहाय निकालपुणे  : ९९.६५नागपूर :९९.८४औरंगाबाद :९९.९६मुंबई :९९.९६कोल्हापूर :९९.९२अमरावती :९९.९८नाशिक : ९९.९६ लातूर :९९.९६कोकण :१००

परीक्षेसाठी बसलेलेविद्यार्थी     :     ९,०९,९३१विद्यार्थिंनी  :     ७,४८,६९३एकूण        :     १६,५८,६२४

निकाल पाहण्यासाठी लिंक : www.result.mh-ssc.ac.inशाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in 

टॅग्स :ssc examदहावीResult Dayपरिणाम दिवसexamपरीक्षा