शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

SSC Exam: “१० वीच्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास तुम्हाला ठार मारू”; याचिकाकर्त्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 10:30 IST

लॉकडाऊनमुळे १० वी बोर्डाच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत मात्र याविरोधात पुण्यातील एका सेवानिवृत्त प्राध्यपकाने हायकोर्टाने धाव घेतली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून या परीक्षा पुन्हा घ्याव्यात या मागणीसाठी हायकोर्टात याचिकाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेहायकोर्टात याचिका दाखल केल्याचा राग मनात धरून याचिकाकर्त्यांना धमकी

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. १० वी च्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणं योग्य राहणार नाही असा आक्षेप घेत धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावरून आता त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.

धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशला याबाबत तक्रार नोंदवली आहे त्यात म्हटलंय की, लॉकडाऊनमुळे १० वी बोर्डाच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून या परीक्षा पुन्हा घ्याव्यात या मागणीसाठी मी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचाच राग मनात धरत फेसबुकच्या माध्यमातून दोन जणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल असं या दोघांनी धमकावल्याचं म्हटलं आहे.

याबाबत पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. प्रथमेश पाटील आणि भगवान ढाकणे असं या दोघांचे नाव आहे. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून या दोघांचा शोध सुरू आहे.

याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिलाय प्रस्ताव

दहावीच्या परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर आणि २ सत्रांत केल्यास हे शक्य होऊ शकते, असे नियोजन याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी मांडले आहे. कुलकर्णी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, शाळेतील दहावीची एकूण विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन त्यांची सकाळ आणि दुपार अशा दोन गटांत विभागणी करून परीक्षा घेतल्यास, गर्दी न होता १५ दिवसांत परीक्षा पार पाडली जाऊ शकते. तसेच परीक्षा केंद्रांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास शाळांकडून आवश्यक ती खबरदारी जबाबदारी म्हणून नक्कीच पार पाडली जाईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.परीक्षेसाठी खासगी वाहने तसेच आवश्यक अशी विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाऊ शकते, असे मतही त्यांनी मांडले

प्रस्ताव असा...

- परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर

- विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

- शाळेत परीक्षार्थी, संबंधित शिक्षकांना प्रवेश

- उत्तरपत्रिकांचे शाळेतच मूल्यांकन

-संगणकीय व्यवस्थेद्वारे सगळे गुण शिक्षण मंडळाकडे पोहोचवणे

नेमका फॉर्म्यूला काय?

राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार नसली तरी त्यांच्या आजवरच्या शालेय कामगिरीच्या आधारावर १०० गुणांची विविध भागांत विभागणी करण्यात आली आहे. यात दहावीच्या अभ्यासक्रमावर लेखी परीक्षेसाठी ३० गुण, इयत्ता १० वीचे विद्यार्थ्यानं आजवर केलेले गृहपाठ आणि तोंडी परीक्षेसाठी २० गुण आणि इयत्ता नववीच्या निकालाला ५० गुण अशाप्रकारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे. यंदा इयत्ता १० वीच्या परीक्षेला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा इयत्ता ९ वीचा निकाल लागला त्यावेळी कोरोनाचं संकट नव्हतं. त्यामुळे तो निकाल सामान्य परिस्थितीतील निकाल होता. त्याच पार्श्वभूमीवर इयत्ता ९ वीच्या निकालाला ५० गुण देण्यात आले आहेत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

टॅग्स :ssc examदहावीHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस