शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

श्रीदेवी सुंदर, पण अत्यंत दुःखी महिला, नातेवाईकांनी केला होता दगा- राम गोपाल वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:30 IST

वादग्रस्त ट्विट करण्यासाठी राम गोपाल वर्मा नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विट्सवरून वादही उद्भवतात. आता त्यांनी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलही अशाच आशयाचं ट्विट केलं आहे.

मुंबई- वादग्रस्त ट्विट करण्यासाठी राम गोपाल वर्मा नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विट्सवरून वादही उद्भवतात. आता त्यांनी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलही अशाच आशयाचं ट्विट केलं आहे. श्रीदेवी सुंदर अभिनेत्री असली तरी अत्यंत दुःखी महिला होती. श्रीदेवींची नातेवाईकांनी ब-याचदा फसवणूक केली होती, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. 

दुबईमधल्या जुमैरा एमिरेट्स टॉवर या हॉटेलच्या रूम नंबर 2201 मध्ये शनिवारी रात्री श्रीदेवी बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. श्रीदेवींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होते. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यू तोल गेल्याने बाथटबमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मृत्यूचे गूढ आणखी वाढतच होते. त्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते, अभिनेत्यांकडून त्याबाबत दुःख व्यक्त केलं जातंय. राम गोपाल वर्मानंसुद्धा श्रीदेवींच्या चाहत्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. वर्मा लिहितात, ती खूप सुंदर अभिनेत्री असून, देशातील सर्वात मोठी सुपरस्टार होती. 20 वर्षांहून अधिक काळ तिने सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवलं.श्रीदेवी यांचं आयुष्य त्यांच्या दृष्टीनं परफेक्ट होतं. सुंदर चेहरा, वाखाणण्याजोगं टॅलेंट, दोन मुलींसोबत चांगला परिवार होता. बाहेरून सगळंच चांगलं दिसतं. पण खरंच श्रीदेवी तिच्या आयुष्यात खूश होती का ?, आनंदी आयुष्य जगत होती का ?, असं म्हणत परिस्थिती या उलट असल्याचं राम गोपाल वर्मानं पत्रात नमूद केलं आहे. वडिलांच्या मृत्यूपर्यंत श्रीदेवी यांचं आयुष्य आकाशात उडणा-या एखाद्या पक्षाप्रमाणे स्वच्छंदी होतं. परंतु आईला असलेल्या मुलीच्या काळजीमुळे श्रीदेवींचं आयुष्य एखाद्या पिंज-यात बंद असलेल्या पक्ष्यासारखी झाली होती. त्या काळात कलाकारांना मानधन काळ्या पैशातून दिलं जात होतं.श्रीदेवीच्या वडिलांनी प्राप्तिकर विभागाच्या भीतीनं पैसे मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केले होते. परंतु त्या लोकांनी श्रीदेवींसोबत दगाबाजी केली. त्यानंतर श्रीदेवींच्या आईनं कायद्याच्या कचाट्यात अडकलेली मालमत्ता सोडवण्यासाठी उर्वरित पैसा खर्च केला आणि या कारणांमुळे श्रीदेवींच्या कुटुंबीयांना पै अन् पैसाठी झगडावं लागलं. त्यानंतर श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर आले. बोनी स्वतः मोठ्या कर्जात होते. अशा परिस्थितीत ते श्रीदेवींसोबत फक्त दुःख वाटू शकत होते. आईनं सर्व मालमत्ता ही श्रीदेवींच्या नावे केली. परंतु तिच्या बहिणीनं मालमत्तेतील अर्धा हिस्सा मागितला आणि श्रीदेवींविरुद्ध खटला भरला. आईनं जेव्हा कागदपत्रांवर स्वाक्षरी केली तेव्हा ती शुद्धीत नसल्याचा दावा श्रीदेवीच्या बहिणीनं केला होता. त्यावेळी आईची ब्रेन सर्जरी झाल्याचंही श्रीदेवीच्या बहिणीनं सांगितलं होतं. अशात अख्ख्या जगात नाव कमावलेली श्रीदेवी खरंतर स्वतःच्या आयुष्यात एकटीच होती. तिचं बोनी कपूर यांच्याशिवाय कोणीच नव्हतं, असंही राम गोपाल वर्मानं पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Srideviश्रीदेवीRam Gopal Varmaराम गोपाल वर्मा