शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विचारधारा सोडल्याने राष्ट्रवादी, उद्धवसेनेत फूट, आमदार विनय कोरे यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:19 IST

मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा मेळावा

मिरज : धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली, मताचे राजकारण करणारा काँग्रेस व राष्ट्रवादी हा पक्ष व हिंदुत्वाचे नाव घेऊन राजकारण करणारा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी उद्धवसेना या पक्षांनी सत्तेसाठी आपली विचारधारा सोडल्याने या पक्षात फूट पडल्याची टीका आमदार विनय कोरे यांनी केली. मिरजेत आयोजित जनसुराज्य पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे हे बोलत होते.महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कलंक काम करणारा जनसुराज्य पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती भक्कमपणे निवडणूक लढवेल. जागावाटपही योग्य प्रकारे होईल. जेथे एकापेक्षा अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक असतील त्याठिकाणी राज्यस्तरावरील नेते वाटाघाटी करून योग्य तो निर्णय घेतील, असेही आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितले.जनसुराज्य पक्ष सर्वसामान्य लोकांचा, गोरगरीब व दीनदलितांचा पक्ष आहे. राज्यात एक ताकदवान पक्ष म्हणून जनसुराज्य पक्ष ओळखला जातो. जनसुराज्य पक्ष राज्यात वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे, असे सांगून आमदार अशोक माने पुढे म्हणाले, कार्यक्षम युवानेते समित कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढत आहे.सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीतील पदाधिकारी जनसुराज्य पक्षात येत आहेत. जनसुराज्य पक्ष हा चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे, असे सांगून जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम पुढे म्हणाले, जातिभेद न करता विकासाच राजकारण करणारा जनसुराज्य पक्ष आहे. सांगली जिल्ह्यात १०० कोटींपेक्षा जास्त विकासनिधी मिळवून दिला आहे. मिरजेत निखिल कलगुटगी यांच्या बाबत दुर्दैवी घटना घडली. कलगुटगी कुटुंबीयांच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत, असेही समित कदम यांनी यावेळी सांगितले.जनसुराज्य युवा शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला. यावेळी आमदार अशोकराव माने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, ज्येष्ठ नेते महादेव कुरणे, अमित कदम, आनंदा देवमाने, आनंदसागर पुजारी, पंकज म्हेत्रे, विजय माने, समीर मालगावे, जयश्रीताई कुरणे, अनिताताई कदम, मोनिका माळी, तमन्ना सतारमेकर, ज्योती मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ideology Abandonment Caused Splits in NCP, Shiv Sena: Vinay Kore

Web Summary : MLA Vinay Kore criticized NCP, Congress, and Shiv Sena (Uddhav) for abandoning ideology for power, causing splits. He spoke at a Jansurajya Party event, highlighting the party's integrity and promising a strong alliance in upcoming elections. Jansurajya is committed to development and stands with the Kalgutgi family, stated Samit Kadam.