शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

बेईमानांवर थुंकणे हा...; खासदार संजय राऊतांनी सांगितला वीर सावरकरांचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:03 IST

मी राजकीय नेत्यांची नावे घेतल्यावर थुंकलो नाही तर बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो हा फरक आहे असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. नेहमी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राऊत विरोधकांवर हल्लाबोल करत असतात. परंतु शुक्रवारी पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी केलेले कृत्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर राऊत बाजूला थुंकले. त्यांचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. 

मात्र शनिवारी संजय राऊत यांनी त्यांनी केलेल्या कृतीचे समर्थन करत वेगवेगळी विधाने केले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा किस्सा सांगून त्यांनी स्वत:ची तुलना थेट वीर सावरकरांशी केली अशी चर्चा आता सुरू झाली आहे आहे. संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकरांना एकदा न्यायालयात आणले होते, तेव्हा त्यांच्याविरोधात माहिती देणाऱ्या बेईमानाला पाहून ते थुंकले. इतिहासात त्याची नोंद आहे. बेईमानांवर थुंकणे ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा भाग आहे. वीर सावरकरांनीही त्यांचा संताप बेईमानांवर थुंकून व्यक्त केला होता असं राऊतांनी म्हटलं. 

त्याचसोबत चीड, संताप कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकते. मी थुंकलो हे दाखवा. माझ्या दाताचा प्रॉब्लेम होता त्यातून ती कृती झाली. परंतु त्यांना असं वाटते लोक आमच्यावर थुंकतात. लोक थुंकतायेत हे खरे आहे पण मी कशाला व्यक्त करू? असं संजय राऊतांनी म्हटलं. त्यानंतरच पुन्हा मी राजकीय नेत्यांची नावे घेतल्यावर थुंकलो नाही तर बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबाशी, बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली त्यांचे नाव समजले आणि माझी जीभ चावली गेली त्यातून ती कृती झाली असं समर्थन संजय राऊतांनी केले. 

अजित पवारांनी राऊतांना दिला सल्लाराजकीय प्रवक्त्यांनी आपल्या राज्याची संस्कृती जपली पाहिजे. आपल्या राज्याला स्व.यशवंतराव चव्हाण यांनी काही परंपरा घालून दिली आहे. संस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो हे देशाला दाखवून दिलं आहे, ते सर्व नेत्यांनी जपलं पाहिजे. प्रत्येक नेत्यांनी तारतम्य ठेवून वागलं पाहिजे असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संजय राऊतांना दिला परंतु त्यावर राऊतांनी धरणामध्ये मुंतण्यापेक्षा थुंकणे चांगले. प्रत्येकाने संयम राखला पाहिजे हे बरोबर आहे. पण ज्याचे जळते त्याला कळते. आम्ही भोगतोय, आम्ही भोगूनसुद्धा जमिनीवर उभे आहोत. आम्ही पक्षासोबत उभे आहोत. पळालो नाही. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, संकट येतायेत म्हणून भाजपासोबत सूत जुळवण्याचा विचार करत नाही असा पलटवार अजितदादांवर केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर