शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शेतकरी कर्जमाफीसाठीच्या हालचालींना वेग; कधीही येऊ शकते गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:32 IST

शरद पवारांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांसाठी ही भेट ठरू शकते.

मुंबई - सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले असून तिन्ही पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यासाठीच्या हालचालींना वेग आल्याचे आला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची गोड बातमी कधीही येऊ शकते.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 12 डिसेंबर रोजी जुन्नर तालुक्यातील शिवसेनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवसेनेरीवरूनच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला होता. असा उल्लेख इतिहासात आढळतो. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात, असंही सांगण्यात येत आहे. 

शरद पवारांचा गुरुवारी वाढदिवस आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांसाठी ही भेट ठरू शकते. या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कायम आग्रही असतात. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यासंदर्भात त्यांच्याकडून एखादी घोषणा होऊ शकते.