शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

शहरी रस्त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती; वर्षातून एकदा होणार आॅडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:38 IST

अपघात रोखण्यासाठी निर्णय; अपघातप्रवण क्षेत्रांची वर्षातून दोनदा होणार तपासणी

- गौरीशंकर घाळे मुंबई : शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून वर्षातून एकदा शहरी भागातील संपूर्ण रस्त्याचे आॅडिट केले जाणार असून अपघातप्रवण क्षेत्रांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्षातून दोनदा तपासणी केली जाणार आहे.दिल्ली एकात्मिक वाहतूक व्यवस्थेकडून शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सूचना स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिका आणि नगर परिषदेसाठी विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. पालिका स्तरावरील समितीचे प्रमुख पद आयुक्तांकडे तर नगर परिषदांचे समिती प्रमुखपद संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे. या समितीत वाहतूक पोलीस, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि स्थानिक अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. शहरी भागातील रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेषत: अपघातप्रवण क्षेत्र सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपविण्यात येणार असल्याची माहिती राज्य वाहतूक विभागातील सूत्रांनी दिली. शहरी भागातील रस्ते अपघातांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीने रस्ते अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली एकीकृत वाहतूक व्यवस्थेला दिले होते. उच्चाधिकार समितीच्या आदेशानंतर दिल्ली एकीकृत वाहतूक व्यवस्थेने आपला अहवाल सादर केला. यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. संबंधित शहरी रस्त्यांच्या आॅडिटनंतर आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या पाठपुराव्याची जबाबदारी विशेष समितीवर असणार आहे.पहिल्या ५०मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकरस्ते अपघातांबाबत केंद्रीय वाहतूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक अपघातांच्या ५० शहरांच्या यादीत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांचा समावेश आहे. २०१७ साली मुंबईत एकूण ३१६० अपघात झाले. यात ४९० लोक दगावले तर ३२८७ जखमी झाले. तर पुण्यातील १५०८ अपघातांत ३७२ ठार तर ११५४ जण जखमी झाले. नागपुरातील १२४२ अपघातांत २३१ जणांना आपले प्राण गमावावे लागले तर १२५६ जण जखमी झाले. नाशिकमधील ६३१ अपघातात १७१ ठार तर ५१० जखमी झाले. एका वर्षाच्या कालावधीत या चार महानगरातील अपघातात एकूण १२६५ जण ठार झाले असून ६२०७ जण जखमी झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात