शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

“...तर आम्ही स्वागतच करू”; खुलताबाद नामांतरावर अबू आझमी यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 20:42 IST

Abu Azmi News: देशातील मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचे काम सुरू आहे. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.

Abu Azmi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अनेक मुद्दे गाजताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देशभरात होणाऱ्या शहरांच्या नामांतरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. खुलताबाद शहराचे नामांतरण करण्याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मागणी केली होती. यावर आता सपा आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत भूमिका स्पष्ट केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. यावरून मोठा वाद राज्यात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. खुलताबाद शहाराचे नाव बदलावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली. मूळात हे नामांतर नाही, तर झालेली चूक दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावा शिरसाट यांनी केला. यावर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. 

...तर आम्ही स्वागतच करू

जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे. एखादे नवे शहर वसवले असते तर वेगळा मुद्दा होता. माझे म्हणणे आहे की, जर नाव बदलल्यामुळे महागाई संपुष्टात येणार असेल, नाव बदलल्यामुळे बेरोजगारी संपणार असेल, नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, आम्ही स्वागत करू. नावे बदलण्याचा मुद्दा काढून देशातील मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचे काम सुरू आहे. देशात महागाई वाढली आहे. इतिहास दाखवला पाहिजे मात्र तो बनावट नसावा. शेजारील देश चीनकडून भाराताच्या भूमीवर कब्जा केला जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे, असे अबू आझमी म्हणाले. 

दरम्यान, खुलताबादचे नाव पूर्वी रत्नपूर होते. हे रेकॉर्डवर आहे. इंग्रजांनी येथे जी सत्ता उपभोगली, ते जे शेतसारा वसूल करायचे त्यातही रत्नपूर असेच लिहिलेले आहे. म्हणून आम्ही काही नवीन मागतोय अशातला भाग नाही. तसेच, दौलताबाद हे दौलताबाद नाही तर देवगिरी आहे. त्याला देवगिरी प्रांत म्हटले जात होते आणि राजा रामदेवरायांचे तेथे राज्य होते. आता दौलताबाद किल्ला काही औरंगजेबाने बांधला आहे का? नाही. ती असलेली वास्तू, तेथे राज्य केले आहे. आपण हे जे नामांतर म्हणतो ना, तर हे नामांतर नाही, तर झालेली चूर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याचे कारण एक आहे, आम्ही जी औरंगजेबाची कबर खोदण्याचा विषय काढला, त्याचा काही लोकांना त्रास झाला. मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आपण आपला स्वाभिमान जागृत करायला नको का? अशी विचारणा संजय शिरसाट यांनी केली होती. 

 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीKhulatabadखुल्ताबाद