शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

“...तर आम्ही स्वागतच करू”; खुलताबाद नामांतरावर अबू आझमी यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 20:42 IST

Abu Azmi News: देशातील मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचे काम सुरू आहे. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.

Abu Azmi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अनेक मुद्दे गाजताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देशभरात होणाऱ्या शहरांच्या नामांतरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. खुलताबाद शहराचे नामांतरण करण्याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मागणी केली होती. यावर आता सपा आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत भूमिका स्पष्ट केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. यावरून मोठा वाद राज्यात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. खुलताबाद शहाराचे नाव बदलावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली. मूळात हे नामांतर नाही, तर झालेली चूक दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावा शिरसाट यांनी केला. यावर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. 

...तर आम्ही स्वागतच करू

जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे. एखादे नवे शहर वसवले असते तर वेगळा मुद्दा होता. माझे म्हणणे आहे की, जर नाव बदलल्यामुळे महागाई संपुष्टात येणार असेल, नाव बदलल्यामुळे बेरोजगारी संपणार असेल, नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, आम्ही स्वागत करू. नावे बदलण्याचा मुद्दा काढून देशातील मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचे काम सुरू आहे. देशात महागाई वाढली आहे. इतिहास दाखवला पाहिजे मात्र तो बनावट नसावा. शेजारील देश चीनकडून भाराताच्या भूमीवर कब्जा केला जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे, असे अबू आझमी म्हणाले. 

दरम्यान, खुलताबादचे नाव पूर्वी रत्नपूर होते. हे रेकॉर्डवर आहे. इंग्रजांनी येथे जी सत्ता उपभोगली, ते जे शेतसारा वसूल करायचे त्यातही रत्नपूर असेच लिहिलेले आहे. म्हणून आम्ही काही नवीन मागतोय अशातला भाग नाही. तसेच, दौलताबाद हे दौलताबाद नाही तर देवगिरी आहे. त्याला देवगिरी प्रांत म्हटले जात होते आणि राजा रामदेवरायांचे तेथे राज्य होते. आता दौलताबाद किल्ला काही औरंगजेबाने बांधला आहे का? नाही. ती असलेली वास्तू, तेथे राज्य केले आहे. आपण हे जे नामांतर म्हणतो ना, तर हे नामांतर नाही, तर झालेली चूर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याचे कारण एक आहे, आम्ही जी औरंगजेबाची कबर खोदण्याचा विषय काढला, त्याचा काही लोकांना त्रास झाला. मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आपण आपला स्वाभिमान जागृत करायला नको का? अशी विचारणा संजय शिरसाट यांनी केली होती. 

 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीKhulatabadखुल्ताबाद