शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:23 IST

महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काही घडेल अशी चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

BJP Reply to Sharad Pawar : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त करत एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटलं. यासोबत शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी राजकारणासाठी हे विधान केल्याचे भाजपनं म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे यासाठी सक्षम असल्याचे म्हटलं. 

नवी मुंबईत डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते, असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

"महाराष्ट्रात हिंसाचार, जातीय दंगली होतील असं भविष्य शरद पवार यांनी वर्तवलं आहे. शरद पवार यांनी ४० वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या तोंडून अशी वक्तव्ये येत आहेत. महाराष्ट्राची जनता कधीही कोणत्याही हिंसाचाराला समर्थन करत नाही. इथली जनता अशी नाही हे शरद पवार यांनाही माहिती आहे. पण राजकारणासाठी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. पण या महाराष्ट्रात हिंसाचाराचा कोणी विचार जरी केला तरी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, राजकारणासाठी महाराष्ट्रात दंगलीच्या गोष्टी करु नका. हे मात्र खरं आहे की, राज्यात काही पक्षाचे लोक समाजात जातीय तेढ निर्माण करुन राजकारण करु पाहत आहेत. लोकसभेतही हेच करण्याचा प्रयत्न केला," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला आहे. मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारManipur Violenceमणिपूर हिंसाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे