शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:23 IST

महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काही घडेल अशी चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

BJP Reply to Sharad Pawar : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त करत एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटलं. यासोबत शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी राजकारणासाठी हे विधान केल्याचे भाजपनं म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे यासाठी सक्षम असल्याचे म्हटलं. 

नवी मुंबईत डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते, असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

"महाराष्ट्रात हिंसाचार, जातीय दंगली होतील असं भविष्य शरद पवार यांनी वर्तवलं आहे. शरद पवार यांनी ४० वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या तोंडून अशी वक्तव्ये येत आहेत. महाराष्ट्राची जनता कधीही कोणत्याही हिंसाचाराला समर्थन करत नाही. इथली जनता अशी नाही हे शरद पवार यांनाही माहिती आहे. पण राजकारणासाठी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. पण या महाराष्ट्रात हिंसाचाराचा कोणी विचार जरी केला तरी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, राजकारणासाठी महाराष्ट्रात दंगलीच्या गोष्टी करु नका. हे मात्र खरं आहे की, राज्यात काही पक्षाचे लोक समाजात जातीय तेढ निर्माण करुन राजकारण करु पाहत आहेत. लोकसभेतही हेच करण्याचा प्रयत्न केला," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला आहे. मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारManipur Violenceमणिपूर हिंसाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे