शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

“कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:45 IST

२०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर – हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्र्यांनी जी आत्मनिर्भरतेकडे पाऊले उचलली त्यामुळे देशाची ताकद वाढली आहे. आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेत. मोदींसोबत कसं लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आलेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कालपरवा कुणीतरी म्हटलं पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत. भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे सांगावे. पण अनेक चेहरे कुणाला असतात हे जनतेला माहिती आहे. अनेक चेहरे रावणाला असतात. तिकडे रावण आहेत आणि आपण इकडे जय श्रीरामवाले रामभक्त आहोत अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

तसेच देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे जगात नावलौकीक वाढवतायेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबर किंबुहना तिसऱ्या नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करतायेत. आज जगभरात आपल्या देशाचे नाव आदराने, सन्मानाने घेतले जाते याचे आपण साक्षीदार आहोत. दुसरीकडे द्वेष, मत्सर, एका माणसाच्या विरोधात एकत्र आले आहेत. बॅनरवर त्या लोकांचे चेहरेही दिसत नाहीत. महाभारतात पांडवांचा विजय झाला होता. कौरव पराभूत झाले होते. परंतु २०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रही नरेंद्र मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील. राधाकृष्ण विखे पाटील सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. विखे पाटलांचे योगदान सर्वश्रूत आहे. सहकार खात्याला पुढे नेण्यासाठी मोदी सरकारमध्ये सहकार मंत्रालय बनवले. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगला बदल घडला पाहिजे यासाठी सहकार मंत्रालय स्थापन केले आणि त्याचे प्रमुख अमित शाह यांना केले. सहकार क्षेत्रातील अनेक उद्योग अडचणीत आले तेव्हा १० हजार कोटी मदत करण्याचं काम केंद्र सरकारने केले असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी