शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये काही धोके - कोहीरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:08 IST

Marathwada Watergrid: मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते  सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले. 

 औरंगाबाद : मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले.

३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोहीरकर म्हणाले, वॉटरग्रीडमध्ये काही धोके आहेत. त्या योजनेत शेती, उद्योग, पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजन आहे. विभागात ११ ते १२ मोठी धरणे आहेत. ती एकमेकांना जोडण्याची ही योजना आहे. भविष्यात यातील निम्म्या धरणांत पाणी असेल, तर ते कुठे आणि किती प्रमाणात द्यायचे. त्याचे वाटप होणे अवघड होईल. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नियोजन करावे लागेल. नाशिक, अहमदनगरमध्ये धरणे बांधली गेली. मोठ्या प्रमाणात धरणे बांधल्याने त्याचा परिणाम जायकवाडीवर झाला. असेच होत राहिले, तर जिल्ह्या-जिल्ह्यांत भांडणे होतील. 

सत्ताधारी मंत्री काय म्हणाले?रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जायकवाडीचे कालवे दुरुस्तीची मागणी केली. गोदावरी खोऱ्यातील बंधाऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी देण्यासह जायकवाडीवरील २ लाख हेक्टरऐवजी  अवघी ८० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येत असल्याचे सांगितले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगावमधील प्रकल्प मार्गी लावून मराठवाड्यातील सिंचनासाठी चर्चासत्र घेण्याचा प्रस्ताव मांडला. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मराठवाड्यात ४ लाख ७९ हजार सिंचनाचा ५,३३२ कोटींचा अनुशेष आहे. कायम अनुशेष असलेल्या जिल्ह्यांत जालना, औरंगाबाद आहेत. त्यासाठी पैसे मिळाले तर कामे होतील.  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा १६१ टीएमसी पाण्याची तूट असलेले खोरे आहे. पैनगंगा, मध्य गोदावरी उपखोऱ्यातून तूट भरून काढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणे भरलेली आहेत, परंतु पुन्हा दुष्काळ आला तर यासाठी जेवढी धरणे आहेत, त्यात कुठूनही आणा, मात्र पाणी द्या. तसे केले तरच पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी मराठवाडा करेल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार