शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये काही धोके - कोहीरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:08 IST

Marathwada Watergrid: मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते  सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले. 

 औरंगाबाद : मराठवाडा वॉटरग्रीड योजनेबाबत निर्णय घेता येईल, परंतु त्याचे काही धोके आहेत, असे मत जलसंपदा खात्याचे मावळते सचिव अजय कोहीरकर यांनी रविवारी व्यक्त केले.

३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोहीरकर म्हणाले, वॉटरग्रीडमध्ये काही धोके आहेत. त्या योजनेत शेती, उद्योग, पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजन आहे. विभागात ११ ते १२ मोठी धरणे आहेत. ती एकमेकांना जोडण्याची ही योजना आहे. भविष्यात यातील निम्म्या धरणांत पाणी असेल, तर ते कुठे आणि किती प्रमाणात द्यायचे. त्याचे वाटप होणे अवघड होईल. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नियोजन करावे लागेल. नाशिक, अहमदनगरमध्ये धरणे बांधली गेली. मोठ्या प्रमाणात धरणे बांधल्याने त्याचा परिणाम जायकवाडीवर झाला. असेच होत राहिले, तर जिल्ह्या-जिल्ह्यांत भांडणे होतील. 

सत्ताधारी मंत्री काय म्हणाले?रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जायकवाडीचे कालवे दुरुस्तीची मागणी केली. गोदावरी खोऱ्यातील बंधाऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी देण्यासह जायकवाडीवरील २ लाख हेक्टरऐवजी  अवघी ८० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येत असल्याचे सांगितले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगावमधील प्रकल्प मार्गी लावून मराठवाड्यातील सिंचनासाठी चर्चासत्र घेण्याचा प्रस्ताव मांडला. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मराठवाड्यात ४ लाख ७९ हजार सिंचनाचा ५,३३२ कोटींचा अनुशेष आहे. कायम अनुशेष असलेल्या जिल्ह्यांत जालना, औरंगाबाद आहेत. त्यासाठी पैसे मिळाले तर कामे होतील.  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाडा १६१ टीएमसी पाण्याची तूट असलेले खोरे आहे. पैनगंगा, मध्य गोदावरी उपखोऱ्यातून तूट भरून काढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणे भरलेली आहेत, परंतु पुन्हा दुष्काळ आला तर यासाठी जेवढी धरणे आहेत, त्यात कुठूनही आणा, मात्र पाणी द्या. तसे केले तरच पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी मराठवाडा करेल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार