शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

स्वाभिमानीत राजू शेट्टींचा एकट्याचा आक्रोश- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:44 IST

खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी अभद्र युती केल्याचा आरोप

सातारा : ‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात राहिला नाही. बिनीचे सरदारही त्यांच्यापासून दुरावले आहेत. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आक्रोश करणार असल्याचे सांगत आहेत, वास्तविक, आक्रोश करायला त्यांच्या पक्षात ते एकटेच उरले आहेत,’ अशी टीका कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केली.सातारा येथे पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, ‘आघाडी सरकार १५ वर्षे सत्तेवर होते. त्या सरकारसोबत शेतकरी संघटनेने अखंडपणे संघर्ष केला. दूध, ऊस, कापूस, सोयाबीन या उत्पादनांना हमीभाव देण्याची मागणी करणाºया शेतकऱ्यांना तेव्हा गोळ्या घालण्यात आल्या. संघटनेचे अनेक कार्यकर्ते अजूनही कोर्टात हेलपाटे मारत आहेत. अनेक शेतकरी मरण पावले. संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या राजू शेट्टींनी मात्र राजकारणात आपले भवितव्य टिकून राहावे, यासाठी प्रस्थापितांसोबत अभद्र युती केली. मी भाजपसोबत गेलो तर माझीच माणसे माझ्याविरोधात हत्यारासारखी वापरली. शेट्टींना शेतकºयांच्या प्रश्नाचं देणं-घेणं राहिलेलं नाही.’राजू शेट्टी आक्रोश यात्रेबाबत खोत म्हणाले, ‘अकरा प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी ते आता आक्रोश यात्रा काढणार आहेत. शेतकरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत, आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्यांच्या एकट्याचाच आक्रोश सुरू आहे.नटसम्राट नाटकासारखी ‘खासदारकी देता का खासदारकी’ अशी त्यांची अवस्था झालेली आहे.’राजू शेट्टी ज्या इव्हीएमविरोधात आंदोलन करायला उठले आहेत, त्या इव्हीएमच्या माध्यमातून ते दोनदा कसे काय निवडून आले. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची इच्छा असेल तर आमचा त्यालाही पाठिंबा राहील, असे स्पष्टीकरणही खोत यांनी केले.विधानसभेसाठी रयत क्रांती १२ जागांसाठी आग्रहीविधानसभा निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटना राज्यातील १२ जागांसाठी आग्रही आहे. सातारा जिल्ह्यातील कºहाड उत्तर, फलटण व माण-खटाव हे तीन मतदारसंघ भाजपकडे मागितले आहेत, असे मत सदाभाऊंनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत