शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

स्वाभिमानीत राजू शेट्टींचा एकट्याचा आक्रोश- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:44 IST

खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी अभद्र युती केल्याचा आरोप

सातारा : ‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात राहिला नाही. बिनीचे सरदारही त्यांच्यापासून दुरावले आहेत. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आक्रोश करणार असल्याचे सांगत आहेत, वास्तविक, आक्रोश करायला त्यांच्या पक्षात ते एकटेच उरले आहेत,’ अशी टीका कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केली.सातारा येथे पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, ‘आघाडी सरकार १५ वर्षे सत्तेवर होते. त्या सरकारसोबत शेतकरी संघटनेने अखंडपणे संघर्ष केला. दूध, ऊस, कापूस, सोयाबीन या उत्पादनांना हमीभाव देण्याची मागणी करणाºया शेतकऱ्यांना तेव्हा गोळ्या घालण्यात आल्या. संघटनेचे अनेक कार्यकर्ते अजूनही कोर्टात हेलपाटे मारत आहेत. अनेक शेतकरी मरण पावले. संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या राजू शेट्टींनी मात्र राजकारणात आपले भवितव्य टिकून राहावे, यासाठी प्रस्थापितांसोबत अभद्र युती केली. मी भाजपसोबत गेलो तर माझीच माणसे माझ्याविरोधात हत्यारासारखी वापरली. शेट्टींना शेतकºयांच्या प्रश्नाचं देणं-घेणं राहिलेलं नाही.’राजू शेट्टी आक्रोश यात्रेबाबत खोत म्हणाले, ‘अकरा प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी ते आता आक्रोश यात्रा काढणार आहेत. शेतकरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत, आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्यांच्या एकट्याचाच आक्रोश सुरू आहे.नटसम्राट नाटकासारखी ‘खासदारकी देता का खासदारकी’ अशी त्यांची अवस्था झालेली आहे.’राजू शेट्टी ज्या इव्हीएमविरोधात आंदोलन करायला उठले आहेत, त्या इव्हीएमच्या माध्यमातून ते दोनदा कसे काय निवडून आले. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची इच्छा असेल तर आमचा त्यालाही पाठिंबा राहील, असे स्पष्टीकरणही खोत यांनी केले.विधानसभेसाठी रयत क्रांती १२ जागांसाठी आग्रहीविधानसभा निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटना राज्यातील १२ जागांसाठी आग्रही आहे. सातारा जिल्ह्यातील कºहाड उत्तर, फलटण व माण-खटाव हे तीन मतदारसंघ भाजपकडे मागितले आहेत, असे मत सदाभाऊंनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत