शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भर सभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं...; म्हणाले, गोष्ट काळजाला चाटून गेली...! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:35 IST

Shahajibapu Patil : "आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवायला, यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्ताकात सांगितले आहे, खऱ्या अर्थाने जडितांच्या विकासाची कामे करायची असतील, तर तुम्हाला खेळात जशी गोटी गजेजवळ ठेवतो, तशी सत्तेच्या गजेजवळ तुमची गोटी असली पाहिजे."

ज्याने पाणी अडवले (सांगोल्याचे) त्याला खासदार म्हणून पाठवले आणि पाणी देणारा घरात बसून आहे. आपलं आपल्याला हाणून-हाणून घ्यावं वाटतं, असे म्हणत शहाजीबापू यांनी भर सभेत स्वतःच्या तोंडात मारून घेतले. एवढेच नाही तर, "आज येथे एवढा सत्कार आहे जयाभाऊंचा आणि त्या माणसानं येथे हार घेतला नाही. गोष्ट काळजाला चाटून गेली माझ्या." असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. ते सांगोल्यात एका जाहीस सभेत बोलत होते.

सांगोला येथे शुक्रवारी (3 एप्रिल) रात्रीच्या सुमारास सर्वपक्षीय नेत्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार केला, यावेळी शेकापचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आदी उपस्थित  होते. शहाजीबापू म्हणाले, "काँग्रेस काय आपली शत्रू होती का? माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. जयाभाऊंचं गेलंय, रंजित दादांचं गेलंय. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जिवनभर पाण्यासाठी काँग्रेस पक्षातून झगडा दिला. दऱ्या खोऱ्यात माणूस फिरला. पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला साथ दिली नाही. मात्र ते जेव्हा शिवसेनेतून खासदार झाले, १९९५ ला शिवसेना-भाजपचं सरकार आलं, सर्वजण कागदं काढून बघा, टेंभू मंजूर केव्हा झाले? म्हैसाळ मंजुर केव्हा झाले? उजनी केव्हा मंजूर झाले? तुमच्या या सर्व योजना शिवसेना आणि भारतीय जनाता पक्षाच्या काळात मंजूर झाल्या आहेत."

पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले, "या ठिकाणी कोण नव्हतं, विलासराव आले, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, राजारामबापू पाटील, बाळासाहेब  देसाई, पतंगराव कदम, अशी डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण, आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हात लावला, तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षानेच लावला हे मी तुम्हाला जाहीर सांगेन." 

राजकारणाच्या वाटा धरताना कोणत्या धरायच्या हे तुम्ही ठरवायला हवे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सल्ला देताना शहाजीबापू म्हणाले, "तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगारपक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय, एवढी बातमी आम्हाला आली की, दंडवत घालत तुमच्या घरी येतो आणि भाई गणपतरावजी देशूम यांच्या पत्नीचं आधी दर्शन घेतो आणि लहान असलात तरी तुमचंही दर्शन घेतो. आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवायला, यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्ताकात सांगितले आहे, खऱ्या अर्थाने जडितांच्या विकासाची कामे करायची असतील, तर तुम्हाला खेळात जशी गोटी गजेजवळ ठेवतो, तशी सत्तेच्या गजेजवळ तुमची गोटी असली पाहिजे."

पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले, आता जयाभाऊ सांगेल त्याच चिन्हाला मतदान करायचे. आईची शपथ तुम्हाल... हात वर करा. देणार की नाही, खरं हात वर करा. ज्याने पाणी अडवले त्याला खासदार म्हणून पाठवले आणि पाणी देणारा घरात बसून आहे. आपलं आपल्याला हाणून-हाणून घ्यावं वाटतं, (शहाजीबापू यांनी भर सभेत स्वतःच्या तोंडात मारून घेतलं). काय माणसं आहोत आपण, काय म्हणून केलं आपण हे, कशासाठी हे पाप केलं, आज येथे एवढा सत्कार आहे जयाभाऊंचा आणि त्या माणसानं येथे हार घेतला नाही. गोष्ट काळजाला चाटून गेली माझ्या." 

    

टॅग्स :SolapurसोलापूरJaykumar Goreजयकुमार गोरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा