शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८६ कोटींची साखर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:02 IST

एफआरपीचे ६०९ कोटी देणे; आधारभूत ३१०० रुपये क्विंटल दराने साखर विक्रीला परवानगी

ठळक मुद्देसाखर विक्री करून एफआरपीची रक्कम देण्याची शासनाने सवलत दिली शासनाने दिलेल्या सवलतीनुसार कारखान्यांनी साखर विक्री सुरू केलीएफआरपी न देणाºया काही कारखान्यांवर आरआरसीनुसार साखर जप्तीची कारवाई

सोलापूर: केंद्र शासनाने ठरविलेल्या ३१०० रुपये क्विंटल आधारभूत किमतीनुसार सोलापूरउस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपयांची साखर शिल्लक आहे. एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम कारखाने शेतकºयांचे देणे आहे.

  राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे असून स्वॉफ्ट लोन घेऊन एफआरपी देण्याची सवलत शासनाने दिली होती. एफआरपी न देणाºया काही कारखान्यांवर आरआरसीनुसार साखर जप्तीची कारवाई करण्यात आली. तरीही कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले नाहीत. त्यानंतर स्वॉफ्ट लोन उचलल्यानंतरही सोलापूर व उस्मानाबादच्या ३३ साखर कारखान्यांनी एफआरपी चुकती केली नसल्याने शासनाने शिल्लक साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत कारखान्यांना दिली आहे.

शासनाने दिलेल्या सवलतीनुसार कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे. १५ मे रोजीच्या सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडील आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३१ व उस्मानाबादच्या १० अशा ४१ कारखान्यांकडे ३८ लाख २५ हजार ३०४ क्विंटल साखर शिल्लक आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ३१०० रुपये  ठरवली आहे. शिल्लक साखरेची केंद्र शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीनुसार ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपये इतकी किंमत होते. दोन्ही जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी १५ जूनच्या अहवालानुसार एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांची दिली नाही. शासनाने दिलेल्या सवलतीप्रमाणे कारखाने शिल्लक साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देत असल्याचे सांगण्यात आले. 

उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये  - उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १६ लाख ५० हजार ८७९ क्विंटल साखर असून त्याची आधारभूत किंमत ५११ कोटी ७७ लाख २४ हजार ९०० रुपये होते तर एफआरपीप्रमाणे १२५ कोटी ४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांचे देणे आहे.आधारभूत किमतीने साखर विक्री झाली तरीही ५१२ कोटी येतात व १२५ कोटी देणे असल्याने उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये आहेत.- सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांकडे २१ लाख ७४ हजार ४२५ क्विंटल साखर शिल्लक असून आधारभूत किमतीप्रमाणे त्याची किंमत ६७४ कोटी ७ लाख १७ हजार ५०० रुपये होते. २५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार ४८३ कोटी ६० लाख रुपये शेतकºयांचे देणे   आहे.

साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देण्याची शासनाने सवलत दिली आहे. त्यानुसार बºयाच कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे.  त्यातून शेतकºयांचे पैसे दिले जातील.  जूनअखेर विक्री झालेली साखर व दिलेल्या एफआरपीची आकडेवारी समोर येईल.- अविनाश देशमुखप्रादेशिक सहसंचालक सोलापूर (साखर) 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजनाOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीagricultureशेती