शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं निधन

By admin | Updated: June 13, 2017 14:33 IST

जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं आज सावंतवाडी येथे निधन झालं .ते 72 वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत

सावंतवाडी, दि. 13-  जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं आज सावंतवाडी येथे निधन झालं .ते 72 वर्षांचे होते.  गोपाळ दुखंडे यांच्या पश्यात त्यांची पत्नी उर्मिला,  मुलगी सोनाली आणि दोन मुलं संतोष आणि संदीप  असा त्यांचं कुटुंब आहे. दुखंडे यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील एक झंझावात शांत झाल्याची भावना व्यक्त होते आहे. त्यांचे पार्थिव आज रात्री मुंबईत आणलं जाईल आणि मंगळवारी सकाळी गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमधील त्यांच्या घरा पासून अंत्ययात्रा निघणार आहे.
 
प्राध्याप गोपाळ दुखंडे यांचे वडील गिरणी कामगार होते, लहानपणापासून संघर्ष करत गोपाळ दुखंडे यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.  कॉलेजमधील शिक्षण सुरू असताना ते जनता दल, छात्रभारती आणि इतर सामाजिक,राजकीय कामं करीत होते. युक्रांद या युवक चळवळीमधून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. गोपाळ दुखंडे यांना कोकणाविषयी आस्था होती त्यामुळेच परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजार पेठ भरविली होती. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. कोकणातील मुलाला कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळावी यासाठी त्यांनी "कोकण रेल्वे जनाधिकार समिती"ची स्थापना केली होती. मालवण विधान सभा मतदार संघातून त्यांनी 1995 साली नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. मुंबई  विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा याचा ते प्रत्येक सभेत आग्रह धरत होते. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले. छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासून लक्ष घातलं होतं. कपिल पाटील,शरद कदम या त्यावेळच्या  विद्यार्थी नेत्याना हाताशी धरून त्यांनी अनेक आंदोलने उभी केली.
 
रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा छात्र भारतीने काढलेला  रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा,त्यावेळचे महापालिका उपायुक्त गो. रा.खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ.कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन,गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वा खाली काढलेला चड्डी,बनियान मोर्चा, भारतमाता सिनेमा वाचविण्यासाठी झालेले आंदोलन,नामांतर लढा,मंडल आयोग स्थापन करण्यासाठी झालेल्या प्रत्येक लढाईत प्राध्यापक दुखंडे  पुढे असत.   काही वर्षा पूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते.