शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं निधन

By admin | Updated: June 13, 2017 14:33 IST

जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं आज सावंतवाडी येथे निधन झालं .ते 72 वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत

सावंतवाडी, दि. 13-  जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं आज सावंतवाडी येथे निधन झालं .ते 72 वर्षांचे होते.  गोपाळ दुखंडे यांच्या पश्यात त्यांची पत्नी उर्मिला,  मुलगी सोनाली आणि दोन मुलं संतोष आणि संदीप  असा त्यांचं कुटुंब आहे. दुखंडे यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील एक झंझावात शांत झाल्याची भावना व्यक्त होते आहे. त्यांचे पार्थिव आज रात्री मुंबईत आणलं जाईल आणि मंगळवारी सकाळी गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमधील त्यांच्या घरा पासून अंत्ययात्रा निघणार आहे.
 
प्राध्याप गोपाळ दुखंडे यांचे वडील गिरणी कामगार होते, लहानपणापासून संघर्ष करत गोपाळ दुखंडे यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.  कॉलेजमधील शिक्षण सुरू असताना ते जनता दल, छात्रभारती आणि इतर सामाजिक,राजकीय कामं करीत होते. युक्रांद या युवक चळवळीमधून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. गोपाळ दुखंडे यांना कोकणाविषयी आस्था होती त्यामुळेच परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजार पेठ भरविली होती. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. कोकणातील मुलाला कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळावी यासाठी त्यांनी "कोकण रेल्वे जनाधिकार समिती"ची स्थापना केली होती. मालवण विधान सभा मतदार संघातून त्यांनी 1995 साली नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. मुंबई  विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा याचा ते प्रत्येक सभेत आग्रह धरत होते. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले. छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासून लक्ष घातलं होतं. कपिल पाटील,शरद कदम या त्यावेळच्या  विद्यार्थी नेत्याना हाताशी धरून त्यांनी अनेक आंदोलने उभी केली.
 
रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा छात्र भारतीने काढलेला  रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा,त्यावेळचे महापालिका उपायुक्त गो. रा.खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ.कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन,गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वा खाली काढलेला चड्डी,बनियान मोर्चा, भारतमाता सिनेमा वाचविण्यासाठी झालेले आंदोलन,नामांतर लढा,मंडल आयोग स्थापन करण्यासाठी झालेल्या प्रत्येक लढाईत प्राध्यापक दुखंडे  पुढे असत.   काही वर्षा पूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते.