शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

सोशल मीडियाबाबत कायदा आणण्याचा डाव, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:25 AM

सोशल मीडियाचे अस्त्र आता भाजपावर उलटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियाचे अस्त्र आता भाजपावर उलटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.सोशल मीडियावर सरकारविरोधी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राज्यातील अनेक तरुणांना पोलिसांकरवी नोटिसा पाठविण्यात येत आहेत. या संदर्भात वृत्तवाहिन्यांशी बोलताना संजय राऊत म्हणालेकी, सोशल मीडियाद्वारे लोकांचीमने कलुषित करून भाजपा सत्तेवर आली. आता हेच अस्त्र त्यांच्यावर उलटले आहे. त्यामुळे सोशल मीडियाबाबत कठोर कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. देशात तालिबानी राजवट येत आहे का, असा सवाल करतानाच, सायबर सेलचे अधिकारी हे भाजपाचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला.गुरदासपूर आणि केरळमधील पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवाचा मला आनंद नाही. मात्र, देशातील जनमत बदलत असल्याचे या निकालावरून दिसते आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची धमकी देत, भाजपा आता मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांवर दबाव टाकू शकत नाही. लोकांनी पाच वर्षांसाठी आम्हाला निवडून दिले याचे भान आम्हाला आहे, असेही राऊत म्हणाले.सोशल मीडियावरील लिखाणावरून नोटीस पाठविल्याप्रकरणी यापूर्वी शरद पवार आणि राज ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली होती. सरकारच्या विरोधात मते मांडणाºया तरुणांची सरकार पोलिसांच्या माध्यमातून गळचेपी करीत असून, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाGovernmentसरकार