शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदींपासून वाचण्यासाठी साप, मुंगूस, कुत्रे एकत्र; अमित शहांचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 05:44 IST

नरेंद्र मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले आहेत. महापूर आला की सगळी खुरटी झाडंझुडपं मोडून पडतात. केवळ वटवृक्ष राहतो आणि पुराला घाबरलेले साप, मुंगूस, कुत्रे, मांजरी त्या वृक्षावर बचावासाठी चढतात.

- विशेष प्रतिनिधीमुंबई - नरेंद्र मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले आहेत. महापूर आला की सगळी खुरटी झाडंझुडपं मोडून पडतात. केवळ वटवृक्ष राहतो आणि पुराला घाबरलेले साप, मुंगूस, कुत्रे, मांजरी त्या वृक्षावर बचावासाठी चढतात. मोदीविरोधकांची आज तशीच अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली.भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी बीकेसी ग्राऊंडवर आयोजित महामेळाव्यात शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, सुरेश प्रभू, हंसराज अहीर, डॉ. सुभाष भामरे, भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष खा.पूनम महाजन, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री तसेच नेते व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी हे भाजपच्या सरकारकडे साडेचार वर्षाचा हिशेब मागत आहेत. पण त्यांच्या चार पिढ्यांनी देशासाठी काय केले, याचा हिशेब आता जनताच त्यांना विचारत आहे. राहुलबाबा हल्ली शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतर मोदी सरकारबद्दल बोलतात.आरक्षण रद्द होणार असल्याची हूल उठवून दिली जात आहे, पण राज्यघटनेने मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण कधीही रद्द होऊ दिले जाणार नाही, असे शहा यांनी ठणकावून सांगितले.केंद्रातील मोदी व महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लावला जाऊ शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, मोदींसारखा जगातील लोकप्रिय नेता आमच्याकडे आहे. खोट्या आश्वासनांवर नाही तर केंद्र व राज्य सरकारच्या दमदार कामगिरीवर आम्हाला पुन्हा यश मिळवायचे आहे. वैचारिक मतभेद असलेले पक्ष आज केवळ आमच्या विरोधात एकत्र येत आहेत. आज आम्ही २० राज्यांत सत्तेत आहोत. पण पश्चिम बंगाल, ओरिसात सत्ता येईल, तेव्हाच यशाचे वर्तुळ पूर्ण होईल. देशाच्या विविध प्रश्नांवर चर्चा नको असलेले विरोधक संसद बंद पाडत आहेत. त्यांनी चर्चेचे ठिकाण निवडावे; आम्ही चर्चेला तयार आहोत, असे आव्हान त्यांनी दिले. मात्र अमित शहा यांनी आपल्या भाषणात कर्नाटक निवडणुकीचा उल्लेख टाळला.राणे अनुपस्थित!भाजपाच्या तिकिटावर नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे या महामेळाव्याकडे फिरकलेच नाही. नारायण राणेंची अनुपस्थिती आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांनी केलेली घोषणाबाजी याचीच चर्चा सभामंडपात होती.अमित शहांनी दिले सेनेशी युतीचे संकेत२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्याच नेतृत्वात एनडीएचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करत भाजपा शिवसेनेशी युती करणार असल्याचे संकेत शहा यांनी दिले. नंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी शिवसेना आमचा मित्र पक्ष राहावी हीच आमची इच्छा असल्याचे सांगितले. बहुमतात असूनही आम्ही केंद्र वा राज्यांमध्ये मित्र पक्षांची साथ सोडलेली नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करून तसे संकेत दिले.सत्तेसाठी हपापलेले लांडगेउद्या दंगली घडवतीलसत्तेच्या आशेने सगळे लांडगे आज एकत्र येत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. आमच्याकडे मोदींसारखा सिंह आहे. हे लांडगे आमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. सत्तेसाठी हपापलेले हे लांडगे उद्या जात, धर्माच्या नावाने दंगली घडवतील, तुमचा बुद्धिभेद करतील, असेही त्यांनी बोलून दाखवले.

टॅग्स :BJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018Amit Shahअमित शाह