शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

स्मार्ट सिटींसाठी स्थानिक नेतृत्व स्मार्ट हवे

By admin | Updated: June 7, 2015 01:44 IST

स्मार्ट सिटींसारख्या योजना यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेतृत्वही स्मार्ट हवे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले.

मुंबई : स्मार्ट सिटींसारख्या योजना यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेतृत्वही स्मार्ट हवे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले. विज्ञान भारती आयोजित ‘स्मार्ट सिटी - डिलिव्हरी आॅफ सिव्हिक सर्व्हिसेस’ या दोन दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन करताना ते वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथे बोलत होते.ते म्हणाले की, स्मार्ट सिटीसारख्या योजना राबविताना लोकांची मानसिकता आधी बदलली पाहिजे, असे सांगत त्यांनी या योजना लोकसहभागाशिवाय यशस्वी होणार नाहीत याची जाणीव दिली. सर्व काही सरकार करेल, असा विचार करण्याची सामान्य माणसाला सवय लागली आहे, ती बदलावी लागेल, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. स्थानिक व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.पाण्याचा पुनर्वापर, एलईडी दिव्यांसारख्या माध्यमातून ऊर्जेचा स्मार्ट वापर हे कळीचे मुद्दे असतील, पाण्याची उपलब्धता व स्वच्छ पाणी हे यापुढील देशासमोरचे आव्हान असेल, याची जाणीव नायडू यांनी करून दिली. या परिसंवादाचे बीजभाषण करताना डॉ. माधवराव चितळे यांनी भारताच्या इतिहासातून नागरी नियोजनासंदर्भात व सामाजिक जीवनासंदर्भात शिकण्याची गरज प्रतिपादित केली. ते पुढे म्हणाले की, सामाजिक अस्मिता हा स्मार्ट सिटीचा पाया असेल, भारत प्राचीन काळाप्रमाणे पुन्हा एकदा जागतिक नागरी जीवनाच्या केंद्रस्थानी येईल, असे डॉ. चितळे म्हणाले. स्मार्ट सिटी नियोजनात जनसहभाग वाढविण्यास नागरी मंच स्थापन करण्याचे आवाहन डॉ. चितळे यांनी केले. उद्घाटन सत्रात प्रा.सुहास पेडणेकर, उद्योजक व या परिसंवादाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अरुण नंदा, डॉ.एस. रामदुराई, प्रा. उदय साळुंके आणि विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ.विवेकानंद पै उपस्थित होते.स्मार्ट सिटीजमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर दिला पाहिजे. आज शहरांमधे रोज कामावर जाताना लांबचा प्रवास करावा लागतो, हे चुकीच्या नियोजनाचे फलित आहे. स्मार्ट सिटींचा विचार करताना निसर्ग संवर्धन, संस्कृती यांचा विचार करून भविष्यकालीन नियोजन केले पाहिजे. - वेंकय्या नायडू