शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सॅटेलाईट मॅपिंगद्वारे गाळ उपसा

By admin | Updated: February 16, 2015 23:42 IST

प्रकाश जावडेकर : नद्यांमधील गाळ उपसा धोरण निश्चित करणार

रत्नागिरी : पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने राज्यातील नद्यांमध्ये कुठल्या ठिकाणी किती वाळू उपसा करावा, कुठे वाळू उपसा करू नये, याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी आता सॅटेलाईटचा आधार घेतला जाणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.सॅटेलाईट फोटोद्वारे माहिती घेऊन तसे नकाशे तयार करण्यात येतील. नद्यांतील वाळू काढण्याबाबत विरोध नाही. परंतु नदी मृत होता नये, असे धोरण काळजीपूर्वक बनवून त्याची अंमलबजावणी केली जाईल. या सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी मार्च २०१५ मध्ये सर्व संबंधितांची बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.विकासकामांचे भूमिपजून, फलक अनावरण आदी कामांसाठी जावडेकर रत्नागिरीत आले होते. इको सेन्सिटिव्ह झोनबाबत कस्तुरीरंगन समितीने ज्या गावांचा उल्लेख केला आहे, त्या सर्व गावांत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी व माहिती जाणून घ्यावी, असे सांगितले होते. त्यानुसार केरळ, कर्नाटक येथील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. गुजरातचे कामही पूर्णत्त्वास आले आहे. मात्र, महाराष्ट्राचे काम अद्याप पूर्ण झाले नसून, येत्या महिनाभरात याबाबतचा अहवाल अपेक्षित आहे.स्वच्छ भारत अभियानबाबतच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे सांगून पर्यावरण खात्यातर्फे प्लास्टिक वेस्टबाबत गंभीर दखल घेण्यात आली आहे. ४० मायक्रॉनच्या वरील कॅरीबॅग्जचा पर्यावरणाला त्रास होत नाही. या बॅगा रिसायकलिंगसाठी उचलल्या जातात. परंतु त्यापेक्षा कमी मायक्रॉनच्या पातळ कॅरीबॅग उचलल्या जात नाहीत. अशा कॅरीबॅग्ज वापरावर पूर्णत: बंदी आहे. त्यामुळे जे कोणी अशा कॅरीबॅग्ज देत असतील, विकत असतील त्यांच्यावर छापे टाकण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रणाला दिले आहेत. अशा कमी मायक्रॉनच्या बॅग निर्मिती कारखान्यांवरही कारवाई होईल. स्वच्छता ही संपूर्ण जनतेची चळवळ व्हायला हवी. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा व हिरवा निसर्ग हा सर्वांचा अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पर्यावरणाला हानी नाही...नद्यांतील वाळू काढण्याबाबत विरोध नाही. परंतु नदी मृत होता नये.केरळ, कर्नाटक येथील सर्व्हेक्षणाचे काम पूर्णत्त्वास.पर्यावरण खात्यातर्फे प्लास्टिक वेस्टबाबत गंभीर दखल.४० मायक्रॉनच्यावरील कॅरीबॅग्ज पर्यावरणाला हानिकारक नाहीत.४० पेक्षा कमी मायक्रॉनची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा.