शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकावर फेरिवाल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट; डोंबिवलीतील रोजचंच मरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 3:28 PM

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते.

ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. पादचारी पुलावरुन बाहेरील बाजुला पूर्व आणि पश्चिमेकडे जेव्हा प्रवासी बाहेर येतात त्या ठिकाणी फेरिवाल्यांनी जागा अडवलेली असते.

- अनिकेत घमंडी

डोंबिवली- मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. विशेषत: फलाट क्रमांक १, ३,४, ५ या ठिकाणी अप-डाऊनच्या जलद आणि धीम्या गतीच्या फलाटावर एकाचवेळी लोकल आली की पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होते. पादचारी पुलावरुन बाहेरील बाजुला पूर्व आणि पश्चिमेकडे जेव्हा प्रवासी बाहेर येतात त्या ठिकाणी फेरिवाल्यांनी जागा अडवलेली असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, कोंडी होते. चेंगराचेंगरी होते. अबालवृद्ध गरोदर मातांना मार्ग काढतांना त्रास होतो. यासंदर्भात प्रवासी संघटनांनी वेळोवेळी स्थानक प्रशासन आणि लोहमार्ग पोलीसांना सतर्क केले आहे. पण तरीही फारसा तोडगा निघत नाही.

आधीच पादचारी पुलाची रुंदी तीन दशकांपासून आहे तेवढीच असल्याने कोंडीत भर पडते. त्यातच रेल्वे हद्दीतील पुलावर फेरिवाले बसतात, सुरक्षा रक्षक त्यांना हटकवण्याचे नाटक करतात. अनेकदा चिरिमिरीसाठी हा दिखावा असल्याचा आरोप प्रवासी करतात. दोन्ही दिशेकडील स्कायवॉकवर बाहेर पडण्यासाठी फेरिवाल्यांचेच अडथळे असतात. त्यामुळे समस्या तीव्र प्रमाणात भेडसावते. मधल्या पुलावरुन येणे फारसे प्रवासी पसंत करत नाहीत. तो पुल लांब पडतो, त्यातच मानपाडा मार्गावर जाण्यासाठी पाटकर रोड, केळकर रोड आदी मार्गावरुन रिक्षा सहज मिळतात. त्यामुळे कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलावरुनच जाणे पसंत करतात. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सुरक्षा रक्षक ठेवतात, पण ती सुविधा तोकडी असते. नावाला असते. अल्पावधीतच ती सुविधा बंद केली जाते, पुन्हा ओरडा झाला की स्थिती जैसे थे होते. ही शोकांतिका असल्याचे प्रवासी सांगतात.

- ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पूर्वेकडील मुंबईच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाच्या पाय-यांची जागा ही अरुंद आहे. एकावेळी केवळ एकच व्यक्ति सुटसुटीतपणे जाऊ शकेल एवढीच जागा तेथे आहे. पण त्यासंदर्भात रेल्वे प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यासाठी स्थानकाचे रिमॉडेलींग झाले तेव्हा तातडीने या पाय-यांची रुंदी वाढवावी असे आवाहन करण्यात आले होते. पण त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा का करण्यात आला. ब्रीजवरुन जाण्यापेक्षा असंख्य प्रवासी हे रेल्वे फाटक बंद असतांनाही जीव धोक्यात घालत रुळ ओलांडत ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांचे हाल, बळीच हवे आहेत का? असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला.

- दिवा स्थानकात देखिल मुंबई मार्गावरील पादचारी पूलाचे पूर्वेकडे जेथे लॅडींग होते, ते लॅडींग होत असतांना प्रवाशांच्या दुतर्फा गर्दीने कोंडी होते. गेल्याच आठवड्यात प्रचंड पाऊस पडला तेव्हा देखिल ही समस्या भेडसावली होती. प्रवासी तेथे ताटकळले, गर्दी झाली होती. तेव्हा चेंगराचेंगरी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी यासंदर्भात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांना कळवले, त्यांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीसांना कळवले. पण ही स्थिती का यावी, पोलीस तेथे असायलाच हवे. गर्दीच्या वेळात तरी सुविधा हवीच अशी अपेक्षा दिव्यातील प्रवाशांनी केली.

- आसनगाव स्थानकातही सध्याचा पादचारी पूल हा अरुंद असून तेथेही लोकल आली की गर्दी वाढते. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. तेथे आवश्यक त्या उपाययोजना व्हायला हव्यात त्या का केल्या जात नाहीत, असा टाहो प्रवाशांनी व्यक्त केला.