शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सह्याद्री पट्ट्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांची दैना, विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने वीज गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:17 IST

Sindhudurg News:

कनेडी - कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी वळिवाच्या वादळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने हजेरी लावल्याने  बेगमीसाठी ठेवलेले सामान झाकून ठेवताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून परिसरातील मार्ग बंद झाले होते. 

विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडून तुटल्याने  वीजही गायब झाली होती. दरम्यान, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहर आणि परिसरातही काही काळ पावसाची रिमझिम सुरू होती. गेले दोन दिवस हवेत मोठी उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे पाऊस पडणार याची चाहूल नागरिकांना लागलीच होती. त्याचबरोबर हवामान विभागानेही ऑरेंज अलर्ट देत वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे मंगळवारी  वळिवाच्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. ठिकठिकाणी उभारून ठेवलेली भाताची उडवी भिजून गेली आहेत. 

वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आंबा, काजूलाही पावसामुळे  मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे चोहोबाजूने नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी  चारा व उडवी झाकून ठेवल्या आहेत.  

सह्याद्री पट्ट्यात बरसलामंगळवारी सायंकाळी   वादळी पावसाने सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, नरडवे, कुंभवडे या गावांना झोडपून काढले. शेतकऱ्यांनी मशागत करण्यासाठी शेतात ठेवलेला पालापाचोळा भिजून गेला.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस