शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री पट्ट्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांची दैना, विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने वीज गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:17 IST

Sindhudurg News:

कनेडी - कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी वळिवाच्या वादळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने हजेरी लावल्याने  बेगमीसाठी ठेवलेले सामान झाकून ठेवताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून परिसरातील मार्ग बंद झाले होते. 

विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडून तुटल्याने  वीजही गायब झाली होती. दरम्यान, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहर आणि परिसरातही काही काळ पावसाची रिमझिम सुरू होती. गेले दोन दिवस हवेत मोठी उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे पाऊस पडणार याची चाहूल नागरिकांना लागलीच होती. त्याचबरोबर हवामान विभागानेही ऑरेंज अलर्ट देत वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे मंगळवारी  वळिवाच्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. ठिकठिकाणी उभारून ठेवलेली भाताची उडवी भिजून गेली आहेत. 

वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आंबा, काजूलाही पावसामुळे  मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे चोहोबाजूने नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी  चारा व उडवी झाकून ठेवल्या आहेत.  

सह्याद्री पट्ट्यात बरसलामंगळवारी सायंकाळी   वादळी पावसाने सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, नरडवे, कुंभवडे या गावांना झोडपून काढले. शेतकऱ्यांनी मशागत करण्यासाठी शेतात ठेवलेला पालापाचोळा भिजून गेला.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस