शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Shocking: शहरात कोरोनाची तर गावात गावकऱ्यांची भीती, 'क्वॉरंटाईन'ची अशीही अमानुष पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 6:16 PM

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक तरुण खेड लोटे येथील घरडा केमिकल कंपनीत कामाला होता. सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 14 मे रोजी त्याने आपल्या मुळगावी केळशी जाण्याचा निर्णय घेतला.

अनेकजण त्यांच्या कामानिमित्त शहरात वास्तव्यास होते. मात्र, बघता बघता कोरोनाने थैमान घालायला सुरूवात केली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, हातात पुरेसा पैसा नाही, जेवायला अन्न नाही. अशात अनेकांना उपासमारीचा सामना करावा लागला. शेवटी अनेकांनी पुन्हा त्यांच्या गावच्या घरचा रस्ता धरला. मग मिळेल तो पर्याय वापरत अनेकजण कसे बसे त्यांच्या मुळगावी पोहोचले. गावी जाऊन तरी सुरक्षित राहाता येईल आणि हाल होणार नाहीत, याच आशेने अनेकजण गावी गेले. मात्र, त्यांच्या पदरी उपेक्षाच पडली. अनेकांना गावच्या सीमेवरच गावकऱ्यांनी रोखले. त्यांना गावात प्रवेश देण्यास सक्त मनाई करण्यात आली. 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक तरुण खेड लोटे येथील घरडा केमिकल कंपनीत कामाला होता. सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 14 मे रोजी त्याने आपल्या मुळगावी केळशी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच्या गावी बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यास मनाई असल्याचे त्याला माहिती नव्हते. जेव्हा तो गावी पोहचला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला गावात येण्यात मनाई केली, तसेच दुसरीकडे जाण्यास सांगितले. या तरूणाने रितसर स्वतःची तपासणी केली होती. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे. त्याला 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे सांगण्यात आले होते.

बाहेरच्या व्यक्तीला गावात घ्यायचे नाही हा नियम झाल्यानेच आम्ही त्याला घरी ठेवले नाही, असं त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर नातेवाईकांनीच पुढाकार घेत त्याला शेतात एका छोट्याशा रिक्षा टेम्पोत राहण्याची सोय केली. या ठिकाणी ना लाईट, ना पाणी, ना टॉयलेट, ना बाथरूम अशातच त्याला दिवस काढावे लागत आहे. मात्र, हा प्रकार समोर येताच अनेक लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. माणुसकीच उरलेली नाही असा राग व्यक्त होताना दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या