शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

धक्कादायक; कर्जमाफीच्या योजनेतून नागरी बँका वगळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:05 IST

महात्मा ज्योतिराव फुले योजना; सोसायट्या, जिल्हा बँकेचा समावेश

ठळक मुद्देपाच एकरापेक्षा कमी जमीन असल्याने राष्ट्रीयीकृत बँक कर्ज देत नाहीतपाच एकरापेक्षा अधिक व बागायती क्षेत्रासाठी राष्ट्रीयीकृत बँका शक्यतो कर्ज देण्यास तयार होतातजिल्हा बँक तर पैसे नसल्याचे कारण सांगत कोणालाही कर्ज देत नाही

सोलापूर: भाजप सरकारप्रमाणेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारने नागरी बँका ‘महात्मा ज्योतिराव फुले’ शेतकरी  कर्जमुक्ती योजनेतून  वगळल्या आहेत. राज्य सरकारने कर्जमुक्ती मंजुरीत जिल्हा बँक संलग्न विकास सोसायट्या तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचा समावेश असेल असे म्हटले आहे. याच बँकांच्या एका पेक्षा अधिक कर्ज खात्यावरील दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती केली जाईल असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शेतकरी कर्जमुक्तीस मंजुरी दिली. यामध्ये एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचललेल्या एकापेक्षा अधिक कर्ज खात्यावर अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाचा कर्जमुक्तीत समावेश केला आहे.  एप्रिल १५ ते मार्च १९ या कालावधीत घेतलेले ३० सप्टेंबर रोजी थकबाकी व परतफेड न केलेल्या दोन लाखांपर्यंत सर्व खात्यास कर्जमुक्ती मिळेल, असेही म्हटले आहे.

मागील भाजप सरकारने दीड लाखापर्यंतचे शेतीकर्ज माफ केले होते. यामध्ये जिल्हा बँक संलग्न विकास सोसायट्या व राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जमाफी केली होती. नागरी बँका कर्जमाफीतून  वगळल्या होत्या. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारच्या कर्जमुक्तीत नागरी बँकांचा समावेश असेल असे म्हटले जात होते. नागरी बँकांना शेतीसाठी कर्ज देण्यास परवानगी नसल्याने नागरी बँका कर्जमुक्तीतून वगळण्यात आल्या आहेत. 

नागरी बँका कशासाठी घ्याव्यात- पाच एकर क्षेत्रापर्यंतच्या शेतकºयांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देत नाहीत. पाच एकरापेक्षा अधिक व बागायती क्षेत्रासाठी राष्ट्रीयीकृत बँका शक्यतो कर्ज देण्यास तयार होतात. जिल्हा बँक तर पैसे नसल्याचे कारण सांगत कोणालाही कर्ज देत नाही. यामुळे गरजवंत शेतकरी नागरी बँकांकडून कर्ज घेतात. अनेक शेतकºयांनी पतसंस्थांचेही शेतावर कर्ज घेतले आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकºयांसाठी नागरी बँकांचाही कर्जमुक्तीत समावेश असावा, अशी मागणी आहे.

पाच एकरापेक्षा कमी जमीन असल्याने राष्ट्रीयीकृत बँक कर्ज देत नाहीत. विकास सोसायटी पैसे नसल्याचे कारण सांगते. मी नाईलाजाने नागरी बँक व पतसंस्थेकडून कर्ज काढले आहे.  यात माझ्यासारख्या शेतकºयांचा काय दोष आहे.- वसंत लिंबाजी साठे, शेतकरी, बीबीदारफळ उत्तर सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीagricultureशेतीBanking Sectorबँकिंग क्षेत्र