शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

धक्कादायक; कर्जमाफीच्या योजनेतून नागरी बँका वगळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:05 IST

महात्मा ज्योतिराव फुले योजना; सोसायट्या, जिल्हा बँकेचा समावेश

ठळक मुद्देपाच एकरापेक्षा कमी जमीन असल्याने राष्ट्रीयीकृत बँक कर्ज देत नाहीतपाच एकरापेक्षा अधिक व बागायती क्षेत्रासाठी राष्ट्रीयीकृत बँका शक्यतो कर्ज देण्यास तयार होतातजिल्हा बँक तर पैसे नसल्याचे कारण सांगत कोणालाही कर्ज देत नाही

सोलापूर: भाजप सरकारप्रमाणेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारने नागरी बँका ‘महात्मा ज्योतिराव फुले’ शेतकरी  कर्जमुक्ती योजनेतून  वगळल्या आहेत. राज्य सरकारने कर्जमुक्ती मंजुरीत जिल्हा बँक संलग्न विकास सोसायट्या तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचा समावेश असेल असे म्हटले आहे. याच बँकांच्या एका पेक्षा अधिक कर्ज खात्यावरील दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती केली जाईल असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शेतकरी कर्जमुक्तीस मंजुरी दिली. यामध्ये एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचललेल्या एकापेक्षा अधिक कर्ज खात्यावर अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाचा कर्जमुक्तीत समावेश केला आहे.  एप्रिल १५ ते मार्च १९ या कालावधीत घेतलेले ३० सप्टेंबर रोजी थकबाकी व परतफेड न केलेल्या दोन लाखांपर्यंत सर्व खात्यास कर्जमुक्ती मिळेल, असेही म्हटले आहे.

मागील भाजप सरकारने दीड लाखापर्यंतचे शेतीकर्ज माफ केले होते. यामध्ये जिल्हा बँक संलग्न विकास सोसायट्या व राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जमाफी केली होती. नागरी बँका कर्जमाफीतून  वगळल्या होत्या. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारच्या कर्जमुक्तीत नागरी बँकांचा समावेश असेल असे म्हटले जात होते. नागरी बँकांना शेतीसाठी कर्ज देण्यास परवानगी नसल्याने नागरी बँका कर्जमुक्तीतून वगळण्यात आल्या आहेत. 

नागरी बँका कशासाठी घ्याव्यात- पाच एकर क्षेत्रापर्यंतच्या शेतकºयांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देत नाहीत. पाच एकरापेक्षा अधिक व बागायती क्षेत्रासाठी राष्ट्रीयीकृत बँका शक्यतो कर्ज देण्यास तयार होतात. जिल्हा बँक तर पैसे नसल्याचे कारण सांगत कोणालाही कर्ज देत नाही. यामुळे गरजवंत शेतकरी नागरी बँकांकडून कर्ज घेतात. अनेक शेतकºयांनी पतसंस्थांचेही शेतावर कर्ज घेतले आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकºयांसाठी नागरी बँकांचाही कर्जमुक्तीत समावेश असावा, अशी मागणी आहे.

पाच एकरापेक्षा कमी जमीन असल्याने राष्ट्रीयीकृत बँक कर्ज देत नाहीत. विकास सोसायटी पैसे नसल्याचे कारण सांगते. मी नाईलाजाने नागरी बँक व पतसंस्थेकडून कर्ज काढले आहे.  यात माझ्यासारख्या शेतकºयांचा काय दोष आहे.- वसंत लिंबाजी साठे, शेतकरी, बीबीदारफळ उत्तर सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीagricultureशेतीBanking Sectorबँकिंग क्षेत्र