शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

धक्कादायक; लग्न का केलं नाही म्हणून मुलाने केला आईचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:37 IST

सोलापूर : आईने माझे लग्न केले नाही म्हणून मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळून खून केला, अशी कबुली देणाºया ...

ठळक मुद्देमोहित विजयकुमार कायत (वय २७, रा. जोडभावी पेठ, विकास लॉजच्या पाठीमागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वडिलाने मोहित याला काय झाले? असे विचारले असता त्याने आई माझे लग्न करीत नसल्याने मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळला असे सांगितले.

सोलापूर : आईने माझे लग्न केले नाही म्हणून मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळून खून केला, अशी कबुली देणाºया पोटच्या मुलास जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार सोमवारी घडला. 

मोहित विजयकुमार कायत (वय २७, रा. जोडभावी पेठ, विकास लॉजच्या पाठीमागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विजयकुमार मोतीलाल कायत (वय ५६, रा. श्रीराम समर्थ निवास, सुरभि कॉलनी आपटे सोसायटी रोड, वारजे माळवाडी, पुणे सध्या जोडभावी पेठ विकास लॉजच्या पाठीमागे, सोलापूर) हे पत्नी नागमणी विजयकुमार कायत (वय ५२), मुलगा रोहित कायत (वय २९), मोहित कायत (वय २७) यांच्यासमवेत पुणे येथे राहत होते. मुलगा रोहित याचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता, तो नोकरीला असल्याने सर्वजण पुण्यात राहत होते. विजयकुमार कायत हे पत्नी नागमणी यांच्यासोबत भाऊ लक्ष्मीकांत कायत यांच्या सोलापुरातील घरी आले होते. 

मोहित कायत हा पुण्यात डिलेव्हरीचे काम करीत होता़ ७ मे रोजी सायंकाळी ८ वाजता तो सोलापुरात लक्ष्मण कायत यांच्या घरी आला. वडिलांनी विचारणा केली असता, त्याने मला खूप त्रास होत आहे, मी मरतो माझे लग्न करा, असे म्हणाला. मोहित याला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने वडिलांनी सम्राट चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. ९ मे रोजी दुपारी ४ वाजता मोहित याला डिस्चार्ज देण्यात आला. १२ मे रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले. सकाळी ६.४५ वाजता मोहित घरासमोर बसला होता. भावजय रोहिणी आरडाओरड करू लागली. विजयकुमार कायत यांनी घरात जाऊन पाहिले असता पत्नी नागमणी कायत ही बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. वडिलाने मोहित याला काय झाले? असे विचारले असता त्याने आई माझे लग्न करीत नसल्याने मी तिचा केबलच्या वायरने गळा आवळला असे सांगितले. विजयकुमार कायत यांनी फिर्याद दिली आहे. 

मोहित याला होते गांजाचे व्यसन...- मोहित कायत याला गांजा पिण्याची सवय होती. तो गांजा या मादक पदार्थाच्या आहारी गेला होता, मागील एक महिन्यापासून त्याने गांजा पिणे सोडून दिले होते. गांजा सोडल्याने त्याला शारीरिक व मानसिक त्रास होत होता. त्याचे लग्न होत नसल्याने, तो मरायची भाषा करीत होता. स्वत: मरण्याऐवजी त्याने निष्पाप आईचा गळा आवळून खून केला. या प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसmarriageलग्न