शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांना धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:37 IST

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे असं या आमदाराने म्हटलं आहे.

बीड – मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभरात ज्वलंत होत चालला असून त्याचा फटका राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु सरकारने आश्वासन न पाळल्याने जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले. जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदी केली.

मराठा आरक्षणासाठी आमदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी सातत्याने आंदोलकांकडून होत होती. त्यात बीडच्या गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची धग आता राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत पोहचली आहे. माजलगाव इथं आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी दगडफेक केली तसेच वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे मराठा आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण मिळाले आहे.

आमदार लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण पवार हे गेवराईतील भाजपाचे आमदार आहेत.

...तर सर्वांनी मिळून राजीनामा देऊ – दिलीप मोहिते पाटील

गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कालखंडात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याठिकाणी प्रशासक आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आमदार, खासदार ही पदेच शिल्लक आहेत. आज लोकांचे प्रश्न खूप आहेत. हे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही बाहेर पडलो नाही तर लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ करू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नका असं आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मराठा समाजाला केले.

त्याचसोबत मला सगळ्याच समाजाचे प्रश्न सरकारी दरबारी मांडायचे आहेत. सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडावं हे आम्ही केले पाहिजे. सवंग लोकप्रियतेसाठी काही भावना व्यक्त करणे चुकीचे वाटते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सर्व मराठा समाजाच्या आमदारांनी एकत्रित आवाज उठवून सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू. नाही दिले तर सर्वांनी राजीनामा देऊ. १-२ आमदारांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. सर्वपक्षीय सर्व आमदारांनी भूमिका घेतली तर सरकारला कायदा करणे भाग पडणार आहे. सगळे एकत्र येऊ आणि समाजासाठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेऊ असंही आमदार दिलीप मोहिते पाटलांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा