शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने शिवस्वराज्य यात्रेला बसणार धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 13:00 IST

आधीच अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहे. त्यातच आता उदयनराजे यांच्या रुपाने स्टारप्रचारकही गेल्यास, राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल स्थितीत सातारा मतदार संघातून विजय मिळविणारे छत्रपती उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाने, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या गळतीला २०१४ मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत ३० नेत्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीमधील उर्वरित बडे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यात उदयनराजे यांचे नाव आले आहे. याआधी उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांच्यासोबत मतभेद असल्याचे सांगत भाजपमध्य प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्याची धुरा उदयनराजे यांच्याकडे सोपविली होती. मात्र त्याचाही काही उपयोग राष्ट्रवादीला होताना दिसत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा सुरू केली होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक होते. डॉ. कोल्हे छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर परिचीत आहेत. तर उदयनराजे यांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्यामुळे ही यात्रा चांगलीच गाजणार अशी शक्यता होती. मात्र सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काही काळासाठी स्थिगीत करण्यात आली आहे.

दरम्यान उदयनराजेच भाजपमध्ये जाणार या चर्चेने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. आधीच अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहे. त्यातच आता उदयनराजे यांच्या रुपाने स्टारप्रचारकही गेल्यास, राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शिवस्वराज्य यात्रा अमोल कोल्हे यांना एकट्यानेच काढावी लागणार, असंच दिसत आहे.