शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

Priyanka Chaturvedi : "एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी..."; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 10:56 IST

Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेशी संबंधित 'शक्ती कायदा' लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींसोबत धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेशी संबंधित 'शक्ती कायदा' लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूरच्या शाळेतील या घटनेने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासासाठी एसआयटीची स्थापन केली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, "एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी पीडित कुटुंबाचं दुःख आणि त्रास समजू शकते. हे अतिशय दुःखद आहे. आपण महिलांना न्याय देण्याबाबत बोलतो, पण आजपर्यंत न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा दिल्ली - कुठेही महिलांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली जात नाही."

"घराबाहेर मुलं कुठे सुरक्षित असतील तर ती शाळेत असतात, असं म्हटलं जातं, मात्र चार वर्षांच्या मुली जेव्हा शाळेत गेल्या तेव्हाच त्यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. जोपर्यंत जनता संतापून रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत राज्य सरकार आपलं तोंड उघडत नाही." महिला सुरक्षेसाठी महाविकास आघाडीच्या राजवटीत विधिमंडळाने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींकडे प्रलंबित असलेल्या 'शक्ती कायदा' विधेयकाबाबत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं." 

"बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात महिलांविरुद्ध अश्लील कृत्य करणाऱ्यांविरोधात 'शक्ती' हा कडक कायदा करण्यात आला होता. आमच्या सरकारने महाराष्ट्रातील मुलींना आश्वासन दिलं होतं की अशा प्रकरणांचा तपास १५ दिवसांत पूर्ण होईल आणि ३० दिवसांत खटला सुरू होईल. मात्र तो कायदा अद्याप मंजूर झालेला नाही. २०२२ मध्ये आमचं सरकार पाडल्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आणि त्यांनी लवकरच हा कायदा करू, असं आश्वासन दिलं होतं. पण २०२४ आलं अजून कायदा झालेला नाही." 

"महिला इतक्या संतप्त आहेत की त्या म्हणतात, मला लाडकी बहीण योजना नको, मला १५०० रुपये नको. आम्हाला आमच्या मुलींसाठी न्याय हवा आहे. आता प्रश्न असा पडतो की, किती दिवस महिलांना फक्त मतदानाचं साधन बनवणार आहात, पण जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही मौन पाळता. याच रागातून लोक रस्त्यावर उतरले" असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस