शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Chaturvedi : "एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी..."; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 10:56 IST

Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेशी संबंधित 'शक्ती कायदा' लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींसोबत धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेशी संबंधित 'शक्ती कायदा' लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूरच्या शाळेतील या घटनेने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासासाठी एसआयटीची स्थापन केली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, "एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी पीडित कुटुंबाचं दुःख आणि त्रास समजू शकते. हे अतिशय दुःखद आहे. आपण महिलांना न्याय देण्याबाबत बोलतो, पण आजपर्यंत न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा दिल्ली - कुठेही महिलांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली जात नाही."

"घराबाहेर मुलं कुठे सुरक्षित असतील तर ती शाळेत असतात, असं म्हटलं जातं, मात्र चार वर्षांच्या मुली जेव्हा शाळेत गेल्या तेव्हाच त्यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. जोपर्यंत जनता संतापून रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत राज्य सरकार आपलं तोंड उघडत नाही." महिला सुरक्षेसाठी महाविकास आघाडीच्या राजवटीत विधिमंडळाने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींकडे प्रलंबित असलेल्या 'शक्ती कायदा' विधेयकाबाबत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं." 

"बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात महिलांविरुद्ध अश्लील कृत्य करणाऱ्यांविरोधात 'शक्ती' हा कडक कायदा करण्यात आला होता. आमच्या सरकारने महाराष्ट्रातील मुलींना आश्वासन दिलं होतं की अशा प्रकरणांचा तपास १५ दिवसांत पूर्ण होईल आणि ३० दिवसांत खटला सुरू होईल. मात्र तो कायदा अद्याप मंजूर झालेला नाही. २०२२ मध्ये आमचं सरकार पाडल्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आणि त्यांनी लवकरच हा कायदा करू, असं आश्वासन दिलं होतं. पण २०२४ आलं अजून कायदा झालेला नाही." 

"महिला इतक्या संतप्त आहेत की त्या म्हणतात, मला लाडकी बहीण योजना नको, मला १५०० रुपये नको. आम्हाला आमच्या मुलींसाठी न्याय हवा आहे. आता प्रश्न असा पडतो की, किती दिवस महिलांना फक्त मतदानाचं साधन बनवणार आहात, पण जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही मौन पाळता. याच रागातून लोक रस्त्यावर उतरले" असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस