शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Priyanka Chaturvedi : "एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी..."; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 10:56 IST

Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेशी संबंधित 'शक्ती कायदा' लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींसोबत धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेशी संबंधित 'शक्ती कायदा' लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूरच्या शाळेतील या घटनेने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासासाठी एसआयटीची स्थापन केली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, "एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी पीडित कुटुंबाचं दुःख आणि त्रास समजू शकते. हे अतिशय दुःखद आहे. आपण महिलांना न्याय देण्याबाबत बोलतो, पण आजपर्यंत न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा दिल्ली - कुठेही महिलांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली जात नाही."

"घराबाहेर मुलं कुठे सुरक्षित असतील तर ती शाळेत असतात, असं म्हटलं जातं, मात्र चार वर्षांच्या मुली जेव्हा शाळेत गेल्या तेव्हाच त्यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. जोपर्यंत जनता संतापून रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत राज्य सरकार आपलं तोंड उघडत नाही." महिला सुरक्षेसाठी महाविकास आघाडीच्या राजवटीत विधिमंडळाने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींकडे प्रलंबित असलेल्या 'शक्ती कायदा' विधेयकाबाबत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं." 

"बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात महिलांविरुद्ध अश्लील कृत्य करणाऱ्यांविरोधात 'शक्ती' हा कडक कायदा करण्यात आला होता. आमच्या सरकारने महाराष्ट्रातील मुलींना आश्वासन दिलं होतं की अशा प्रकरणांचा तपास १५ दिवसांत पूर्ण होईल आणि ३० दिवसांत खटला सुरू होईल. मात्र तो कायदा अद्याप मंजूर झालेला नाही. २०२२ मध्ये आमचं सरकार पाडल्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आणि त्यांनी लवकरच हा कायदा करू, असं आश्वासन दिलं होतं. पण २०२४ आलं अजून कायदा झालेला नाही." 

"महिला इतक्या संतप्त आहेत की त्या म्हणतात, मला लाडकी बहीण योजना नको, मला १५०० रुपये नको. आम्हाला आमच्या मुलींसाठी न्याय हवा आहे. आता प्रश्न असा पडतो की, किती दिवस महिलांना फक्त मतदानाचं साधन बनवणार आहात, पण जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही मौन पाळता. याच रागातून लोक रस्त्यावर उतरले" असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस