शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:42 IST

'नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही.'

Sharad Pawar On BJP: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरुन सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य समोर आले असून यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'एक विचारधारा आणि पक्ष देशातील बंधुभाव नष्ट करत आहे', अशी टीका त्यांनी केली.

माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, 'अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता. नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही. निवडणूक आयोगाचा वापर विरोधात केला जात आहे. हा राजकीय पक्षावरचा हल्ला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय कधीच दिला नव्हता. निवडणूक आयोगाचा असा निर्णय पहिल्यांदाच पाहिला,' असं शरद पवार म्हणाले.

याशिवाय शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढतीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, 'शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती आणि त्यांचे निवडणूक चिन्ह आयोगाने दुसऱ्या कोणाला दिले होते. माझीही काँग्रेसविरोधात पक्ष चिन्हावरुन लढत सुरू होती, पण त्यावेळी निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता,' असंही ते म्हणाले.

'सत्तेचा गैरवापर करून एखाद्या पक्षाला व एखाद्या नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी लोक त्या नेतृत्त्वासोबत उभे राहतात. यापूर्वीही काही पक्षांमध्ये फूट पडली. मात्र, रागाची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेण्याचा प्रकार आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय हे महत्त्वाचं आहे', असे शरद पवार पुण्यात बोलताना म्हणाले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग