शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

Priyanka Chaturvedi : "हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में; हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार"; शिवसेनेचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:22 IST

Priyanka Chaturvedi Slams Modi Government, BJP : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे. 

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला. सरकार स्थापन होऊन ३६ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एका महिन्यात ६ हून अधिक वेळा दिल्ली वारी झाली. अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही. परंतु शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्र में... हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Shivsena Priyanka Chaturvedi) यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. तसेच हे सरकार अवैध असल्याची सर्वाधिक जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला आहे असंही म्हटलं आहे. "हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्र में या नीतीने कुठलेही सरकार फार काळ टिकत नाही 40 जणांनी बंडखोरीचा मार्ग निवडला, हे सर्व विश्वासघातकी लोक आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार सातत्याने लांबणीवर पडत आहे."

"सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी पाहिल्यात तरी लगेच लक्षात येईल की बंडखोरांबाबत जनतेसोबतच न्यायव्यवस्थेचे काय मत झाले आहे. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की, या लोकांच्या स्वार्थामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं चांगलं सरकार सत्तेबाहेर पडले. हे सरकार अवैध असल्याची सर्वाधिक जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला आहे. कोणाला मंत्रिमंडळात घ्यावं आणि कोणाला बाहेर थांबवावं असा प्रश्न आहे. या प्रश्नावरुन हे सरकारही कोसळू शकतं, हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार आहे" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

३० जूनला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विधानसभेत सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा डावपेच सुरू असल्याने कॅबिनेट विस्तार रखडला आहे. त्याशिवाय शिंदे गट आणि भाजपा यांच्यात खातेवाटपावरून सहमती बनत नसल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोलले जात आहे. सरकार चांगले काम करत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आठवड्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूतोवाच केले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार