शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Priyanka Chaturvedi : "हम दो केंद्र में, हमारे दो महाराष्ट्र में; हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार"; शिवसेनेचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:22 IST

Priyanka Chaturvedi Slams Modi Government, BJP : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे. 

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला. सरकार स्थापन होऊन ३६ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एका महिन्यात ६ हून अधिक वेळा दिल्ली वारी झाली. अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही. परंतु शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्र में... हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Shivsena Priyanka Chaturvedi) यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. तसेच हे सरकार अवैध असल्याची सर्वाधिक जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला आहे असंही म्हटलं आहे. "हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्र में या नीतीने कुठलेही सरकार फार काळ टिकत नाही 40 जणांनी बंडखोरीचा मार्ग निवडला, हे सर्व विश्वासघातकी लोक आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार सातत्याने लांबणीवर पडत आहे."

"सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी पाहिल्यात तरी लगेच लक्षात येईल की बंडखोरांबाबत जनतेसोबतच न्यायव्यवस्थेचे काय मत झाले आहे. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की, या लोकांच्या स्वार्थामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं चांगलं सरकार सत्तेबाहेर पडले. हे सरकार अवैध असल्याची सर्वाधिक जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला आहे. कोणाला मंत्रिमंडळात घ्यावं आणि कोणाला बाहेर थांबवावं असा प्रश्न आहे. या प्रश्नावरुन हे सरकारही कोसळू शकतं, हे रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार आहे" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

३० जूनला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विधानसभेत सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा डावपेच सुरू असल्याने कॅबिनेट विस्तार रखडला आहे. त्याशिवाय शिंदे गट आणि भाजपा यांच्यात खातेवाटपावरून सहमती बनत नसल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोलले जात आहे. सरकार चांगले काम करत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आठवड्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूतोवाच केले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार