शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याची राऊतांकडून सारवासारव; म्हणाले - मुख्यमंत्री ठाकरेंचा थेट संबंध येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 15:27 IST

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जे बोलतात अथवा जे सांगतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध येत नाही, असे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुणे -काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जे बोलतात अथवा जे सांगतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध येत नाही, असे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाहीत, असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. (Sanjay raut, Ashok chavan)

राऊत म्हणाले, “अशोक चव्हाण जे बोलतात अथवा जे काही सांगतात, त्याच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट काहीही संबंध येत नाही. हा विषय कॅबिनेटचा आहे आणि तो कॅबिनेटमध्ये सुटू शकतो.”

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्य सरकारमध्ये काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, असे चव्हानांनी म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली.

"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका

चव्हाण म्हणाले होते, काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत, आम्ही मुख्यमंत्र्यांना २-३ वेळा सांगितले, तीन पक्षांचे सरकार आहे, असं असताना आमच्याही महापालिकेला निधी मिळाला पाहिजे. आम्हालाही ताकद मिळाली पाहिजे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली

तसेच निवडणुकीनंतर भाजपाचं सरकार येऊ नये यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, शिवसेनेची आघाडी करायची की नाही? याबाबत भरपूर चर्चा झाली, सोनिया गांधी आमच्यावर नाराज होत्या. परंतु आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली, भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेला पाठिंबा दिला, भाजपाचं सरकार नको, त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी भूमिका पटवून सांगितले, त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये आली असंही अशोक चव्हाणांनी सांगितले.  

Sanjay Raut : " काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! "

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAshok Chavanअशोक चव्हाणShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस