शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

...तेव्हा मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंचा सभागृहात दीपक केसरकरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 16:42 IST

शाळेत मातीची मैदानं कमी होत चालली आहे. शालेय इमारतीचा विकास करताना ही मैदानं तयार होतील यावर भर दिला पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई - शालेय शिक्षण खाते दीपक केसरकरांकडे आले, हे खाते त्यांनी स्वीकारलं तेव्हा मला सुखद धक्का बसला. मी वेगवेगळ्या गोष्टी ऐकून होतो. जुन्या आठवणीही आहेत. मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मला प्रेमाचे सल्ले दिले होते खाते न घेण्याबाबत. शालेय शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. देशात शिक्षणाचा अधिकार आहे परंतु दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या देशाला सुपर पॉवर बनवायचं असेल तर हे स्वप्न केवळ शिक्षणाच्या जोरावर पूर्ण होऊ शकतं. प्रत्येक लहान गोष्टींवर विचार केला तर शिक्षणासाठी महाराष्ट्रात नवी संधी उभी करू शकतो असं शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी विधानसभेत म्हटलं. प्राथमिक शिक्षण खात्याच्या पुरवणी मागणीवर ते बोलत होते. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, शालेय शिक्षणावर बोलताना ३ गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. विकास, अभ्यासक्रम आणि कौशल्य अभ्यासक्रम, शाळांच्या इमारतीची डागडुजी नसते. रंगरंगोटी नसते. दरवाजे तुटलेले असतात. बाथरुम खराब असते. वर्ग काळोखात असतात. वर्ग कसा असतो यावर लक्ष दिले पाहिजे. पुरेसा प्रकाश वर्गात आहे का हे पाहिले पाहिजे. शाळा उद्धाटन करता बाथरुममध्ये जाळ्या असतात परंतु त्यावर मोठं भोक पडलेले दिसतं. ज्यातून आरपार पाहिलं जाते. टॉयलेट आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था एका भितींवर नको. प्रत्येक शाळेत कॅन्टीन असणे गरजेचे आहे. शिक्षक, स्टाफसाठी बसण्याची योग्य व्यवस्था असावी असं त्यांनी सांगितले. 

तसेच शाळेत मातीची मैदानं कमी होत चालली आहे. शालेय इमारतीचा विकास करताना ही मैदानं तयार होतील यावर भर दिला पाहिजे. मुंबईच्या शाळेत आम्ही विविध सुविधा दिल्या. यंदा महापालिकेच्या शाळेत १ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त झाली आहे. जे आपले शिक्षक आहेत त्यांना वारंवार ट्रेनिंग दिले पाहिजे. हेडमास्टरांना काही प्रमाणात आर्थिक निर्णय घेण्याची ताकद दिली पाहिजे. मिड मे मिलमध्ये फक्त खिचडी दिली जाते. लहान मुलांना वेगवेगळे पौष्टीक आहार दिले पाहिजे. जिल्ह्यांमध्ये सेंट्रल किचनची सुविधा देऊन त्यातून विद्यार्थ्यांना आहार देऊ शकतो असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, शैक्षणिक प्रकारात वेगवेगळ्या गोष्टींचे शिक्षण दिले पाहिजे. सेफ स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षा दिली पाहिजे. शहरासोबत ग्रामीण भागातही यावर लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या मानसिकतेवर लक्ष दिले पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर vidhan sabhaविधानसभा