शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे नाराज; महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमधील मतभेद उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:40 IST

आज राज्यात गृहमंत्र्यांवर कुणीही नाराजी व्यक्त करतं. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत. जे पोलिसांना फोनवरून आदेश देतात. काही अदृश्य गृहमंत्री आहेत असा आरोप भाजपाने केला आहे.

मुंबई – राज्यात मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीच्या निर्णयाला १२ तास उलटत नाहीत तोवर स्थगिती देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बुधवारी रात्री गृह विभागाने पोलीस खात्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर गुरुवारी सकाळी गृह खात्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यामागे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आले आहे.

पदोन्नतीबाबत गृहमंत्र्यांनी विश्वासात घेतले नाही म्हणून मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकारी महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे हे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर हद्दीत त्यांना बदली देण्यात आली होती. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) ठाण्याचे पालकमंत्री आहेत. आघाडी सरकार असताना जिल्ह्यात कुठल्या अधिकाऱ्यांना नेमायचे याबाबत पालकमंत्र्यांशी समन्वय साधून निर्णय घेतला जातो. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये असं झाले नाही. माध्यमात बातमी आल्यानंतर एमएमआर विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याचं समजलं.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो संपर्क झाला नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याशी संपर्क साधला. सामान्य प्रशासन खातं मुख्यमंत्र्यांकडेच आहे. पोलीस बदल्यांची अखेरची सही मुख्यमंत्र्यांकडेच असते. परंतु गृह विभागाने त्यांनाही कळवलं नसल्याचं समोर आले. त्यानंतर आता गृह खात्याने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यावरून आता विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

अजब सरकारची गजब कहाणी – भाजपा

पोलीस विभाग हा शिस्तीचा विभाग असल्याचं म्हटलं जातं. आज राज्यात गृहमंत्र्यांवर कुणीही नाराजी व्यक्त करतं. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत. जे पोलिसांना फोनवरून आदेश देतात. काही अदृश्य गृहमंत्री आहेत. पोलिसांचं राजकीयकरण सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलीस खाकी गणवेशाचा उपयोग वसुली करण्यासाठी केला गेला. ज्यांनी भ्रष्टाचार मोडीत काढायचा त्यांनीच भ्रष्टाचाराला खतपणी घालायचं काम या सरकारने केले. यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, पोलीस महासंचालकांनी सुचवलेल्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका. मात्र मविआ सरकारमध्ये जर कुणी पोलीस ऐकत नसेल तर त्यांना बदली करण्याची धमकी दिली जाते असा आरोप माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिस