शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे नाराज; महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमधील मतभेद उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:40 IST

आज राज्यात गृहमंत्र्यांवर कुणीही नाराजी व्यक्त करतं. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत. जे पोलिसांना फोनवरून आदेश देतात. काही अदृश्य गृहमंत्री आहेत असा आरोप भाजपाने केला आहे.

मुंबई – राज्यात मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीच्या निर्णयाला १२ तास उलटत नाहीत तोवर स्थगिती देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बुधवारी रात्री गृह विभागाने पोलीस खात्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर गुरुवारी सकाळी गृह खात्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यामागे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आले आहे.

पदोन्नतीबाबत गृहमंत्र्यांनी विश्वासात घेतले नाही म्हणून मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकारी महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे हे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर हद्दीत त्यांना बदली देण्यात आली होती. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) ठाण्याचे पालकमंत्री आहेत. आघाडी सरकार असताना जिल्ह्यात कुठल्या अधिकाऱ्यांना नेमायचे याबाबत पालकमंत्र्यांशी समन्वय साधून निर्णय घेतला जातो. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये असं झाले नाही. माध्यमात बातमी आल्यानंतर एमएमआर विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याचं समजलं.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो संपर्क झाला नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याशी संपर्क साधला. सामान्य प्रशासन खातं मुख्यमंत्र्यांकडेच आहे. पोलीस बदल्यांची अखेरची सही मुख्यमंत्र्यांकडेच असते. परंतु गृह विभागाने त्यांनाही कळवलं नसल्याचं समोर आले. त्यानंतर आता गृह खात्याने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यावरून आता विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

अजब सरकारची गजब कहाणी – भाजपा

पोलीस विभाग हा शिस्तीचा विभाग असल्याचं म्हटलं जातं. आज राज्यात गृहमंत्र्यांवर कुणीही नाराजी व्यक्त करतं. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत. जे पोलिसांना फोनवरून आदेश देतात. काही अदृश्य गृहमंत्री आहेत. पोलिसांचं राजकीयकरण सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलीस खाकी गणवेशाचा उपयोग वसुली करण्यासाठी केला गेला. ज्यांनी भ्रष्टाचार मोडीत काढायचा त्यांनीच भ्रष्टाचाराला खतपणी घालायचं काम या सरकारने केले. यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, पोलीस महासंचालकांनी सुचवलेल्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका. मात्र मविआ सरकारमध्ये जर कुणी पोलीस ऐकत नसेल तर त्यांना बदली करण्याची धमकी दिली जाते असा आरोप माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिस