शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Bhaskar Jadhav : "शिवसेना अंगार आहे, आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला तर राजकीय कारकीर्द जळून भस्मसात होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 19:06 IST

Shivsena Bhaskar Jadhav : "उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य पाऊल उचललं आहे. ही तर सुरुवात आहे अशा अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज आहे."

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना यांच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. "गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने मान ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्रपक्षाने केलं" असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच "शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे. आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला तर खेळणाऱ्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही" असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला आहे. 

"भाजपाने संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा धसका घेतला आहे. याच कारण असं की, गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने मान ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्र पक्षाने केलं" असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "शिवसेनेशी युती असताना मात्र या पक्षाने अनेक पक्षाची युती केली आणि मित्र पक्षांना संपवलं. पण याच दरम्यान शिवसेनेने कोणाशी युती केली नाही" असंही म्हटलं आहे. 

"अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज"

"उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य पाऊल उचललं आहे. ही तर सुरुवात आहे अशा अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज आहे. कारण शेवटी ही शिवसेना टिकावी ही फक्त शिवसैनिकांची इच्छा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संभाजी बिग्रेडसोबत केलेली युती योग्य असून मी तिचं स्वागत करतो" असंही सांगितलं. यासोबतच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे"

"शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक इतिहास आहे. 56 दसरा मेळावा घेण्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला, एक चिन्ह, एक झेंडा असलेला पक्ष म्हणजे शिवसेना आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा असला तरी तो या देशाचा मान आणि शान आहे. त्यामुळे अशा मेळाव्याला विरोध होईल असं मला वाटत नाही. जर कोणी असा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. शिवसेना अंगार आहे, तो ज्वलंत निखारा आहे. आगीशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला तर खेळणाऱ्यांची राजकीय कारकीर्द जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही" असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपा