शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Ambadas Danve : "नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात"; शिवसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:04 IST

Shivsena Ambadas Danve Slams BJP Narayan Rane : उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका राणेंनी केली. यानंतर आता शिवसेनेने नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंशी कट्टर राजकीय वैर असलेल्या नारायण राणे (BJP Narayan Rane) यांनीही या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका राणेंनी केली. यानंतर आता शिवसेनेने नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "नारायण राणे हे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात" अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. 

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. "नारायण राणे यांना फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही. ते भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात" असा खोचक टोला त्यांनी राणेंना लगावला आहे. तसेच "बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना उभी केली. पण बाळासाहेबांच्या विचारांना छेद देऊन गद्दारी सुद्धा राणेंनी केली आहे. पक्ष हा शिवसेना प्रमुखांचा असताना तो स्वत:चा करण्याचा प्रयत्न त्यावेळी राणेंनी केलाच होता. पण शिवसैनिकांनी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तो प्रयत्न हाणून पाडला. म्हणून आजही या धक्क्यातून नारायण राणे सावरू शकलेले नाहीत" असं दानवे यांनी म्हटलं आहे. 

"नारायण राणे जेवढे आमदार घेऊन गेले होते त्यांचं आता राजकीय अस्तित्व काय आहे?, त्यातले किती लोक आता नारायण राणे यांच्यासोबत आहेत? हा प्रश्न नारायण राणेंनी स्वत:लाच विचारला तर त्यांनाच त्यांचं उत्तर मिळेल" असं म्हणत अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व आणि शिवसैनिक यांची आठवण होत आहे. त्यांची चिंता वाटत आहे. अडीच वर्ष सत्तेवर असताना त्यांना शिवसैनिक आठवला नाही. हिंदुत्त्व आठवलं नाही आणि मराठी माणूसही आठवलं नाही. आता मुलाखलीतून सविस्तर आपलं मत मांडत आहेत. सत्ता गेल्यानंतर तडफडणं म्हणतो त्या भावनेतून एक केविलवाणा प्रयत्न, व्यथा या मुलाखतीच्य माध्यमातून त्यांनी देशासमोर मांडली आहे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपद गेल्याने व्याकूळ झाले आहेत. मुख्यमंत्रिपद गेल्याने मला कुठलंही दु:ख नाही, असं ते म्हणताहेत. पण उद्धव ठाकरेंना मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी 39 वर्षे ओळखतो. अंगात खोटारडेपणा आहे, कपटीपणा आहे आणि दुष्ट बुद्धी आहे. अशी व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसून त्यांनी अडीच वर्षांत ना जनतेचं, ना शिवसैनिकांचं ना हिंदुत्वाचं कोणतही हीत वा कुठलंही काम केलं नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेNarayan Raneनारायण राणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे