शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २५ फुटाने कमी केली'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 04:25 IST

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत शासनाकडून सातत्याने जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.

नागपूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत शासनाकडून सातत्याने जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने पुन्हा छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची ७.५ मीटरने (२५ फूट) कमी केली आहे. मूळ आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची १९२ मीटर प्रस्तावित केली होती, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला.ते म्हणाले, महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची १६० मीटर आणि चौथऱ्याची उंची ३२ मीटर अशी रचना करण्यात आली होती. या संरचनेनुसार राज्य शासनाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे २ फेब्रुवारी २०१५ रोजी पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज केला आणि २३ फेब्रुवारी २०१५ रोजी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. पण मान्यता मिळूनदेखील या प्रकल्पावर जवळपास दोन वर्षे पुढे काहीही काम झाले नाही. मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे ठरले. पण आदल्याच दिवशी २३ डिसेंबर २०१६ रोजी सदर प्रकल्पाच्या संरचनेमध्ये महत्त्वाचे बदल करून पुन्हा एकदा पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज करण्यात आला. संरचनेमध्ये हे बदल करताना ते जगातील सर्वात उंच स्मारक असेल, अशी जाहिरातदेखील केली गेली.प्रत्यक्षात मात्र महाराजांच्या धातूच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची १६० मीटरवरून १२६ मीटर कमी केली तर त्याखाली असलेल्या काँक्रिटच्या चौथºयाची उंची ३२ मीटरवरून वाढवून ८४ मीटर करण्यात आली. एकूण स्मारकाची उंची पूर्वीच्या तुलनेत १८ मीटरने वाढवली असली तरीदेखील प्रत्यक्षात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची ३४ मीटरने (११२ फूट) कमी केली असे सांगून चव्हाण म्हणाले, हाती आलेल्या नव्या माहितीनुसार प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी शासनाने आणखी चलाखी केली आहे. एल अँड टी कंपनीच्या पहिल्या निविदेनुसार प्रकल्पाची मूळ किंमत रु. ३,८२६ कोटी होती. शासनाने हा प्रकल्प रु. २,५०० कोटी अधिक रु. ३०० कोटी जीएसटी म्हणजे रु. २,८०० कोटीत बसवायला सांगितले. या नवीन बदलानुसार स्मारकाच्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची आणखी ७.५ मीटरने (२५ फूट) कमी केली व त्याऐवजी तलवारीची उंची तेवढ्याच प्रमाणात वाढवली आहे.>सभागृहाबाहेरही राडाअरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे. पुतळ्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर सभागृहात झालेल्या गोंधळानंतर त्याचे पडसाद सभागृहाबाहेर पडले. विरोधकांनी सत्ताधाºयांना टार्गेट करीत सरकारने शिवाजी महाराजांची अस्मिता डागाळली आहे, असा आरोप केला. विरोधकांच्या आरोपावर बोलताना भाजपाचे आमदार अनिल बोंडे म्हणाले की, महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे राजकारण करून विरोधक महाराजांचा अपमान करीत आहेत. छत्रपतींचा अपमान करणाºयांना पिटाळून लावले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे म्हणाले की, विरोधकांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पुतळ्याची उंची कमी न करता दोन मीटरने आणखी वाढविली आहे. शिवाय पुतळ्याला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. पावसाळा संपल्यानंतर पुतळ्याच्या निर्मितीचे कामही सुरू होईल.>चव्हाण यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते असे -२३ फेब्रुवारी २०१५ मध्ये अंतिम पर्यावरणीय मंजुरी मिळूनसुद्धा प्रकल्पाच्या भूमिपूजनाला जवळपास दोन वर्षे विलंब (डिसेंबर २०१६) का झाला?प्रकल्पाला अंतिम पर्यावरण मंजुरी मिळाल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रस्ताव का पाठवण्यात आला?२४ डिसेंबर २०१६ ला भूमिपूजनाची तारीख ठरल्यानंतर आदल्याच दिवशी प्रस्तावात बदल करून केंद्राला का पाठवला?राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला असल्याने महाराजांच्या ब्राँझच्या पुतळ्यावरील खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता का?जून २०१८ मध्ये पुन्हा महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करून व तलवारीची उंची तितकीच वाढवण्यामागे खर्च कमी करणे हेच कारण आहे का?