शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

बिहारमधील फॉर्म्युल्याने शिवसेनेला बळ, भाजपात मात्र अस्वस्थता; लोकसभेत निम्म्या जागा मागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 5:24 AM

बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.

मुंबई - बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.बिहारमध्ये गेल्यावेळी ३० जागा लढविणाऱ्या भाजपाने यंदा १३ जागांवर पाणी सोडले. त्यातील पाच जागा तर गेल्यावेळी जिंकलेल्या होत्या. २०१९ मध्ये स्वबळावर केंद्रात सत्ता येणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाने मित्र पक्षांना गोंजारणे सुरू केले असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला तर अन्य राज्यांमधील भाजपाच्या मित्र पक्षांनादेखील भाजपाकडून अधिक आणि मनासारख्या जागा मिळविता येऊ शकतात, असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये सोमवारी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केल्यानंतर भाजपा-शिवसेनेतील दरी अधिकच वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेसाठीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना युतीची बोलणी या ताणलेल्या संबंधांमुळे अद्याप सुरू होऊ शकलेली नाही.२०१४ मध्ये युतीत भाजपाने २४ जागा लढविल्या आणि २३ जिंकल्या होत्या. शिवसेनेने २० जागा लढून १८ जिंकल्या होत्या. शिवसेनेकडील तीन-चार जागा आता भाजपाला हव्या आहेत पण तीन राज्यांमधील पराभव, घटक पक्षांना सांभाळून ठेवण्यावर पक्षनेतृत्वाने दिलेला भर यामुळे आता भाजपा जास्तीच्या जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी आग्रही राहण्याबाबत साशंकता आहे. निम्म्या जागा (२४) आम्हाला द्या, असा आग्रह शिवसेनेकडून होऊ शकतो. आपल्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये मित्र पक्षांचे समाधानही भाजपाला करावे लागणार आहे.मित्रांची संख्या होतेय कमी२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार हे जवळपास निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. ठाकूर यांना सोबत ठेवण्यात भाजपाला अपयश आले. आता रासपा, रिपाइं आणि लोकसंग्राम हे तीन पक्ष भाजपासोबत आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा