शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 12:57 IST

कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे.

मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीपासून विविध राजकीय पक्षांच्या प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असताना आता राजकीय रणनितीकारांची भूमिका निर्णायक ठरत आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून राजकीय रणनितीकारांना नियुक्त करण्यात येत असून महाराष्ट्रात यामध्ये शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून बंडखोरीच्या पावित्र्यात असणाऱ्या आणि पक्षाला डोईजड होऊ पाहणाऱ्या नेत्यांना आवर घालण्यासाठी शिवसेनेने स्वतंत्र यंत्रणा उभारल्याचे समजते. त्यामुळे शिस्त न पाळणाऱ्या नेत्यांना धडकी भरणार आहे.

शिवसेनेने लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची सेवा घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रशांत किशोर यांच्या संस्थेचे १०० हून अधिक पदाधिकारी निवडक लोकसभा मतदार संघात फिरत होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाचं काम न करणाऱ्या आणि आगामी काळात बंडखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या नेत्यांची माहिती शिवसेना नेतृत्वाला मिळाली आहे. अशा नेत्यांना वेळीच वेसण घालण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्यावर दुसऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई केली जात नसल्याचा संदेश पक्षात जाणार आहे. ही स्वतंत्र यंत्रणाच पक्षातील डोईजड नेत्यांना आवर घालणार हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून संबंधीत जिल्ह्यातील नेत्यांवर कारवाई केली जात होती.

या यंत्रणेचे काम आढळराव पाटील यांच्या शिरूर मतदार संघातून दिसून आले आहे. प्रशांत किशोर यांच्या अहवालानंतरच शिरुर मतदार संघातील शिवसेना नेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यानंतर जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके, जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यासह काही तालुका प्रमुखांवर केलेली कारवाई ही प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या अहवालानुसारच केल्याचे समजते. त्यामुळे कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे.