शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 12:57 IST

कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे.

मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीपासून विविध राजकीय पक्षांच्या प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असताना आता राजकीय रणनितीकारांची भूमिका निर्णायक ठरत आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून राजकीय रणनितीकारांना नियुक्त करण्यात येत असून महाराष्ट्रात यामध्ये शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून बंडखोरीच्या पावित्र्यात असणाऱ्या आणि पक्षाला डोईजड होऊ पाहणाऱ्या नेत्यांना आवर घालण्यासाठी शिवसेनेने स्वतंत्र यंत्रणा उभारल्याचे समजते. त्यामुळे शिस्त न पाळणाऱ्या नेत्यांना धडकी भरणार आहे.

शिवसेनेने लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची सेवा घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रशांत किशोर यांच्या संस्थेचे १०० हून अधिक पदाधिकारी निवडक लोकसभा मतदार संघात फिरत होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाचं काम न करणाऱ्या आणि आगामी काळात बंडखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या नेत्यांची माहिती शिवसेना नेतृत्वाला मिळाली आहे. अशा नेत्यांना वेळीच वेसण घालण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्यावर दुसऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई केली जात नसल्याचा संदेश पक्षात जाणार आहे. ही स्वतंत्र यंत्रणाच पक्षातील डोईजड नेत्यांना आवर घालणार हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून संबंधीत जिल्ह्यातील नेत्यांवर कारवाई केली जात होती.

या यंत्रणेचे काम आढळराव पाटील यांच्या शिरूर मतदार संघातून दिसून आले आहे. प्रशांत किशोर यांच्या अहवालानंतरच शिरुर मतदार संघातील शिवसेना नेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यानंतर जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके, जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यासह काही तालुका प्रमुखांवर केलेली कारवाई ही प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या अहवालानुसारच केल्याचे समजते. त्यामुळे कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे.