शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Sanjay Raut: “भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 09:16 IST

Sanjay Raut: ताठ मानेने शिवसेनेचा बाणा दाखवून देणाऱ्या संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे, असे शिवसेना आमदाराने म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. यानंतर आता एका बड्या आमदाराने केलेल्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. भाजपने संजय राऊत यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले होते. संजय राऊत यांची वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची राऊतांची मानसिकता होती, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

शिवसेना पक्षातील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत आठ दिवसांपूर्वी भेटले होते. वर्षभर मी नसेन. माझे जे काम आहे, त्यात तुम्हाला मदत करावी लागेल. शिवसेना वाढवावी लागेल, त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. वर्षभरानंतर पुन्हा येईन, असे राऊत म्हणाले होते. त्यांनी ती मानसिक तयारीच केली होती. म्हणूनच ते तडफेने भाजपवर बोलत आहेत, भाजपच्या चुकीच्या धोरणांवर बोलत होते. त्यावरून आपल्याला अटक होणार हे त्यांना माहिती होते, असे वैभव नाईक यांनी सांगितले आहे. 

संजय राऊतांना आधीच कल्पना होती

ईडी अटक करणार असल्याचे संजय राऊतांना आधीच कल्पना होती. भाजपने राऊतांना शरण येण्यास सांगितले होते. तुम्हाला जेल हवेय की, भाजप असे दोन पर्याय त्यांच्या पुढे ठेवले होते. मात्र त्यांनी ताठ मानेने शिवसेनेचा बाणा दाखवून आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. मात्र भाजप समोर झुकणार नाही असे सांगितले असल्याचा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला.

तुम्हाला अटक करायची आहे, हे वरूनच आदेश आहेत

गेले वर्ष दीड वर्ष ईडीकडून राऊतांना सातत्याने चौकशीला बोलावले जात होते. ते चौकशीला गेले. पण चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्नच विचारला नाही. उलट त्यांना सांगितले तुम्हाला अटक करायची आहे, हे वरूनच आदेश आहेत, असा दावा करतानाच काहीही झाले तरी आम्ही राऊतांच्या पाठी ठामपणे उभे आहोत, असे वैभव नाईक यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, भाजपकडून देशभरात विरोधकांच्या मागे चौकशा लावून त्यांना अटक करत आहे. जेलमध्ये जा किंवा भाजपमध्ये या, असे धोरणच भाजपने अवलंबले आहे, असा गंभीर आरोप करत, सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या चौकशा सुरू झाल्या. त्या थांबण्यासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत. मात्र संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक BJPभाजपा