शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:48 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठका घेत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याने विरोधकांकडून टीका होत असताना आता, उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार असल्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडल्यानंतर पक्ष वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी असणारा बंजारा समाज दुरावू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीमध्ये येण्याची शक्यता आहे. पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरे धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंतांची भेट घेण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री संजय राठोड पोहरादेवीत आले होते. 

आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान पोहरादेवीला ते भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे मुंबईतील काही पदाधिकारी पोहरादेवीला दाखल झाले आहेत. पोहरादेवीच्या दर्शननंतर उद्धव ठाकरे हे रामराव महाराज स्मृतीस्थळ, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवीच्या दर्शनाला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे आता बंजारा समाज शिवसेनेशी दूर जाऊ नये म्हणून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामिल झालेले आमदार आणि विद्यमान मंत्री संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणी अनेक आरोप केले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने स्थापन केलेल्या सत्तेत संजय राठोड पुन्हा एकदा मंत्री झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाजाने मोर्चा काढला होता.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे