शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Maharashtra Politics: “गेल्या १० वर्षांत उद्धव ठाकरे बांधावर जाऊन बळीराजाला भेटले, तुम्ही एवढं केलं तरी पुरेसं आहे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 11:42 IST

Maharashtra News: सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारे आमचे कदाचित पहिलेच सरकार होते, असा दावा करत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली.

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असून, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजप टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहेत. परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तुम्ही किमान धीर तरी द्यावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून आत्ता तरी शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याची अपेक्षा नाही. कारण हे सरकार निर्दयी झाले आहे. शेतकऱ्यांसोबत उभे राहाणे गरजेचे आहे. त्यांना जाऊन धीर देणे एवढे जरी केले तरी पुरेसे आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.  

आमचे कर्तव्य आहे की आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन उभे राहावे

गेल्या १० वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारे आमचे कदाचित पहिलेच सरकार होते. जरी विरोधी पक्षात असलो, तरी राजकीय समाज म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन उभे राहावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडला. त्याआधीपासून आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. सरकार कितीही घटनाबाह्य असले, तरी सरकारी यंत्रणेकडून मदत लगेच झाली पाहिजे, अशी अपेक्षा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली. 

दरम्यान, या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत. महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवे. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. फक्त खोटे बोलत राहायचे, हेच सरकारचे धोरण आहे, अशी घणाघाती टीकाही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस