शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Politics: “केतकी चितळेच्या रुपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे”; नीलम गोऱ्हेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 19:31 IST

Maharashtra News: जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यावरून आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना केतकी चितळेवर बोचरी टीका केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा निर्णय घेऊ नये. नक्की विनयभंग झाला आहे का ते तपासाव लागेल. विनयभंग झाला आहे का नाही याचा निर्णय कोर्ट देईल. मी तो व्हिडीओ पाहिला. त्यात जो समोर येईल त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करताना दिसत आहे. वैर भावना राजकीय नेत्यांच्या मनात येऊ नये. त्यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे दुर्देवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. राजकारणात एकमेकांच्या विरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे. ते बरोबर नाही, या शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी निशाणा साधला. 

केतकी चितळेच्या रुपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे

केतकी चितळे यांना मी मदत केली होती. पण तिची काही विधाने पाहता केतकी चितळे हिच्या रूपाने महाराष्ट्रात मिनी कंगना राणावत जन्माला येत आहे, अशी बोचरी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच बाल दिनानिमित्त मुंबईत एका शाळेत कार्यक्रम ठरला होता. तिथे मुख्यमंत्री उशिरा पोहचले. मुख्यमंत्र्यांनी शाळेतील विद्यार्थी म्हणजे गुवाहाटीला नेलेले आमदार नाही हे लक्षात घ्यायला हवे. ५० खोक्यांवरुन बोलले तर एवढे का वाईट वाटते? एका शिवसेना कार्यकर्त्याचा मला फोन आला होता. ते त्यांना रुमाल भेट देणार आहेत असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला. 

दरम्यान, पोलीस नियमांनुसार गुन्ह्याची चौकशी करतील. या प्रकरणी तपास करतील. पडताळणी करतील. जी काही तक्रार आहे, त्यात तथ्य असेल किंवा नसेल, त्याप्रमाणे पोलीस पुढील कार्यवाही करतील. आमच्या सरकारने राजकीय सूड भावनेपोटी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि करणारही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेKetaki Chitaleकेतकी चितळेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड