शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

“शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 15:55 IST

Maharashtra Politics: अजितदादांवरील विधानाने शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते का, असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला होता.

Maharashtra Politics: अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, शरद पवार भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जाते. यातच आता शरद पवार यांनी अजितदादांबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाला शरद पवारांनी समर्थन दिल्याचे दिसत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

अजित पवार हे आमचेचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचे काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत असून, संजय राऊतांनी मीडियाशी बोलताना सडेतोड भूमिका मांडली आहे. 

शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...

शरद पवारांच्या अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे का, असा प्रश्न संजय राऊतांना करण्यात आला होता. यावर, शरद पवार यांनी उत्तर द्यायचे आहे. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यायचे आहे. मी माझी भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार नाहीत, केवळ शरद पवार आहेत. भाजपबरोबर गेलेल्यांना, हुकूमशाही प्रवृत्तीबरोबर हातमिळवणी करणाऱ्यांना, अशा कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला महाविकास आघाडीत स्थान नाही. ईडीला घाबरून ज्यांना जायचे आहे ते जाऊ शकतात. मग ते आमच्याकडून गेलेले असतील अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले असतील, तो निर्णय त्यांचा आहे. जसे शरद पवार म्हणाले, ही लोकशाही आहे, त्यामुळे तो निर्णय त्यांचा असेल. परंतु, आमचे महाविकास आघाडीचे काही निर्णय आहेत. दोन दगडांवर किंवा तीन दगडांवर पाय असे कोणाचे राजकारण असेल तर त्यासंदर्भात जनता निर्णय घेईल, असे संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केले असावे. शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय. आमच्यामध्ये, शिवसेनेत संभ्रम निर्माण होतो. शरद पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार